Result SSC HSC दहावी व बारावीचा निकाल कधी लागणार पहा?
.
नमस्कार मित्रांनो आज १मे महाराष्ट्र दिन व कामगार दिना निमित्त सर्वांना शुभेच्छा आज लहान वर्गातील सर्वांना निकाल जाहीर होतो. परंतु दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल कधी लागणार याची आतुरता बोर्डाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थांना लागलेली असते.
दहावी आणि बारावीचा निकाल राज्य शिक्षण मंडळाकडून वेळीच लावण्याचे नियोजन चालू असून उत्तपत्रिका तपासणीचे काम प्रगतीपथावर चालू आहे निकाल लवकरच जाहीर होणार आहे. दहावी साठी यावर्षी सतरा लाख विद्यार्थ्यांनी तर बारावी साठी बारा लाख विद्यार्थीनी परीक्षा दिलेली आहे.
दहावीचा SSC चा निकाल हा 6 जून पर्यंत तर बारावीचा HSC चा निकाल 25 मे पूर्वी लावण्याचे नियोजन करण्यात येत आहे?
RTE प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळाली! पहा कधीपर्यंत!
.
सन २०२४-२०२५ एक शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागासवर्ग घटकाकरिता २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही दिनांक १६ एप्रिल २०२४ पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती तर ३० एप्रिल २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. परंतु त्यास आज मुदतवाढ मिळाली आहे.
सन २०२४- २०२५ या शैक्षणिक वर्षांमध्ये या प्रक्रियेमध्ये काही नवीन नियम आणि काही बदलांमुळे दरवर्षी पेक्षा यावर्षी प्रवेश नोंदणी कमी प्रमाणात होत आहे. मागील वर्षी प्रवेशासाठी एक लाख जागांसाठी दुपटीपेक्षाही जास्त प्रवेश नोंदणी झाली होती परंतु यावर्षी आरटीई संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार राज्यभरातील ७६ हजार ५३ शाळांमध्ये ८ लाख ८६ हजार ४११ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. आतापर्यंत सुमारे ४७ हजार विद्यार्थ्यांच्या अर्जांची नोंदणी झाली आहे. खासगी स्वयंअर्थसहाय्यित विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध होत नसल्याने पालकांनी या प्रवेश प्रक्रियेकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे.
२५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही दिनांक १६ एप्रिल २०२४ पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती तर ३० एप्रिल २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. परंतु आता दिनांक १० मे २०२४ पर्यंत मुदतवाढ मिळाली असून पालकांना अर्ज भरण्यास आणखीन दहा दिवस अवधी मिळाला आहे.
WhatsApp बंद होणार? WhatsApp ने भारतातील सेवा बंद करण्याचा दिला इशारा!
.
आजकाल या डिजिटल युगामध्ये सर्वांच्याच हातामध्ये अँड्रॉइड फोन आले आहेत व जवळजवळ प्रत्येकच युजर्स च्या फोन मध्ये WhatsApp मेसेंजर आहे. WhatsApp या मेसेंजर ला जगभरात युजर्सची पसंती आहे.
आज भारतामध्ये चाळीस कोटीहून अधिक युजर्स WhatsApp Messenger वापरत आहेत. केंद्र सरकारच्या IT धोरणानुसार या युजर्सच्या मेसेजचा डेटा WhatsApp ने रेकॉर्ड करून ठेवायचा आहे. पण केंद्राच्या या नव्या नियमा विरोधात WhatsApp ने कोर्टात धाव घेतलेली आहे. भारतात सर्वाधिक वापरले जाणारे WhatsApp भारतात बंद होणार का? या चर्चेला उधान आले आहे.
मेसेज एन्क्रिप्शन म्हणजेच WhatsApp वरील युजर्सची गोपनीयता तोडण्याचा केंद्र सरकारने तगादा लावला तर भारतात व्हॉट्सऍप सेवा देणं बंद करु असे WhatsApp ने दिल्ली कोर्टात म्हंटले आहे.
केंद्र सरकारच्या नव्या IT धोरणा विरोधात Facebook व WhatsApp (META) यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. परंतु ही याचिका सुप्रीम कोर्टाने दिल्ली कोर्टाकडे हस्तांतरित केली आहे. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान WhatsApp ने युजर्सचे मेसेज किंवा माहिती शेअर करता येणार नाही असे स्पष्टपणे कोर्टासमोर म्हंटले आहे. तसेच युजर्सची मॅसेज ची प्रायव्हसी आम्हाला तोडता येणार नाही व युजर्स ची माहिती स्टोर पण करता येणार नाही असे आमचे धोरण नाही असे सांगितले आहे.
केंद्र सरकारच्या नवीन IT धोरणानुसार सुरक्षित आणि विश्वासदर्शक इंटरनेट भारतात वापरता यावे यासाठी नवा कायदा अमंलात आणला आहे. देशात अशांतता पसरवणाऱ्या युजर्सपर्यंत पोहचता यावे यासाठी हे नियम केंद्राने बदलले आहेत. सोशल मीडियावरील काही साईटसवरुन खोटे मेसेज फिरवले जातात त्यावर निर्बंध घालण्यासाठी WhatsApp ने या नियमांचे पालन करावे असे केंदाचे म्हणणे आहे. परंतु या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ ऑगस्ट रोजी होणार असून आता केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात WhatsApp ने आक्रमक पवित्रा घेतल्याने WhatsApp सेवा बंद होणार का अशी चिंता भारतातील WhatsApp वापरकर्त्यांना वाटू लागली आहे.
RTE नियमा मध्ये का केले बद्दल? दोन आठवड्यात उत्तर देण्याचे न्यायालयाचे आदेश!
.
शिक्षण हक्क कायदा RTE च्या नियमांमध्ये महाराष्ट्र शासनाने केलेले बदलामुळे इंग्रजी माध्यमातील खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेणे पालकांसाठी अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे पालकांमध्ये संतापचे वातावरण तयार झाले आहे.
शिक्षण विभागाने यावर्षी शिक्षण हक्क कायद्याच्या नियमांमध्ये काही बदल केलेले आहेत ते असे राहत्या घरापासून एक किलोमीटरच्या अंतरावर जर शासकीय शाळा, अनुदानित शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा असेल तर तुम्हाला या शाळेमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.
काही शिक्षणहक्क कार्यकर्ते यांनी यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे या प्रकरणात न्यायालयात सुनावणी झाली असून याचिकेनुसार दुर्बल, वंचित, सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २५% राखीव जागेवर प्रवेश दिले जातात.
यापूर्वी अरुणाचल प्रदेश, उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश आदी राज्यांत खासगी शाळांत मुभा देणारे नियम तेथील सरकारने तयार केले. मात्र तसे नियम हे उच्च न्यायालयाने रद्द केल्याचा दाखला न्यायालयाला देण्यात आला आहे. २००९ च्या शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी विनाअनुदानित शाळांना मुभा देता येत नाही.
खासगी शाळांना वेळेत परतावा दिल्यास त्यांचा देखील विरोध होणार नाही. राज्य सरकारचे नवे नियम बेकायदेशीर व अन्यायकारक असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.
RTE अंतर्गत उपलब्ध शाळा नसल्यास स्वयंअर्थसहाय्यित खासगी शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. नुकतेच RTE ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत. या नियमांची अंमलबजावणी झाल्यास विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. नव्या नियमांमुळे श्रीमंतांच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळा तर गरीब मुलांसाठी शासकीय शाळा, अशी वर्गवारी तयार होईल, असा दावाही याचिकाकर्त्यांनी केला आहे.
Health Insurance च्या या नियमात झाला बदल? ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाची बातमी!
धकाधकीचे जीवनामध्ये वाढत्या आजारचे प्रमाण पाहता आरोग्य विमा हा सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.
ज्येष्ठ नागरिकासाठी एक अत्यंत महत्वाची व आनंदाची बाब म्हणजे आता वयाच्या ६५ वर्षा नंतर सुद्धा आरोग्य विमा पॉलिसी चे कवच मिळणार? कारण आता आरोग्य विमा पॉलिसी मध्ये बदल करण्यात आला आहे. आत्ता पर्यंत आरोग्य विमा पॉलिसी कंपन्या वयाचे कारण सांगून ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विमा पॉलिसी नाकारत होते परंतु आता IRDAI ने नियम शिथिल केल्या मुळे वयाच्या ६५ वर्षानंतर सुद्धा आरोग्य विमा कवच मिळणार आहे.
आता आरोग्य विमा काढताना वयाची अट नाही. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देखील विमा काढता येईल. तसेच काही गंभीर आजार असल्यास त्या व्यक्तीला आरोग्य विमा नाकारता येणार नाही हे नवीन नियम १ एप्रिल २०२४ पासून लागू होतील.
हृदयरोग, कर्करोग, एडस्, किडनी विकार या सारख्या आजारांना देखील विमा नाकारता येणार नाही वय कितीही असले तरी विमा काढता येईल तसेच आरोग्य विम्याचा प्रतीक्षा कालावधी हा ४८ महिन्या वरून ३६ महिने करण्यात आला आहे. यामुळे विमा कंपनीच्या मनमानीला चांगलाच चाप बसला आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक समाधानाची बाब म्हणावी लागेल.
Old Pension Scheme पहा राज्यसरकारने कोणत्या कर्मचाऱ्यास जुनी पेन्शन योजना लागू केली?
राज्यातील अधिकारी/कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे बाबत दि. २२/०४/२०२४ रोजी राज्याने महत्वाचा शासन निर्णय जाहीर केला असून महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रशासकीय नियंत्रणा खालील अधीक्षक अभियंता (स्थापत्य) संवर्गातील अधिकारी यांना सदरील शासन निर्णया नुसार जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या उपरोक्त निर्णयाच्या धर्तीवर, महाराष्ट्र शासनाच्या सेवेत जे अधिकारी / कर्मचारी दि.०१ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा तदनंतर शासन सेवेत नियुक्त झाले आहेत. तथापि त्यांची पदभरतीची जाहिरात / अधिसूचना दि. ०१ नोव्हेंबर २००५ पूर्वी निर्गमित झालेली आहे. अशा राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम १९८२ महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम १९८४ व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम १९९८ व अनुषंगिक नियमाच्या तरतूदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय (One Time Option) संदर्भाधिन क्र.१ येथील शासन निर्णयान्वये देण्यात आलेला आहे.
या निर्णयानुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील अधीक्षक अभियंता (स्थापत्य) संवर्गातील अधिकाऱ्यांचे अर्ज / विकल्प शासनास प्राप्त झालेले आहेत. अश्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील अधीक्षक अभियंता (स्थापत्य) संवर्गातील अधिकारी आहेत, ज्यांची नियुक्ती राज्य शासनाच्या सेवेत दि.०१ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त करण्यात आले आहेत. किंवा त्यांची पदभरतीची जाहिरात / अधिसूचना दि. ०१ नोव्हेंबर २००५ पूर्वी निर्गमित झालेली आहे. अशा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणातील अधीक्षक अभियंता (स्थापत्य) संवर्गातील अधिकारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सदरील शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे…
भारतीय क्रिकेट प्रेमी साठी आनंदाची बातमी T-20 World Cup 2024 साठी भारतीय क्रिकेट संघ BCCI ने जाहीर केला आहे यामध्ये 15 खेळाडू आहेत. यामध्ये प्रामुख्याने कोणाचा समावेश होण्याची शक्यता आहे ते पाहुयात.
BCCI ने T-20 World Cup 2024 संघाची निवड केली असल्याची घोषणा केल्याची माहिती मिळाली आहे. या संघामध्ये अजून काही बदल होतील असं देखील BCCI ने सांगितलं आहे.
हा संघ संभाव्य असेल असे सांगण्यात आले आहे.
Summer Care राज्यात येणार उष्णतेची लाट? थंड पाणी न पिण्याचा सल्ला!
आला उन्हाळा आरोग्य सांभाळा!
एप्रिल महिना सुरू झाला आणि पारा चढला आहे तापमान चाळीस पार होत असून उन्हाची दाहकता खूपच जाणू लागली आहे. त्यामुळे अनेकांना उष्माघाचा त्रास होऊ लागला आहे. तापमान वाढलेले असल्यामुळे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे तरीपण कामानिमित्त घराबाहेर पडावे लागत आहे.
देशभरात उनहाळा वाढत असून पुढील काही दिवसात ४० ते ५० अंश सेल्सियस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या उन्हाळ्याच्या दिवसात अतिथंडपाणी किंवा बर्फाचे पाणी पिणे टाळावे आणि साधेपाणी प्यावे असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान, सध्या मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर आणि इतर देश उष्णतेची लाट अनुभवत आहेत. तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यावर खूपथंड पाणी न पिण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे, कारण असे केल्यास आपल्या लहान रक्तवाहिन्या फुटण्याची किंवा रक्तवाहिन्या अरुंद झाल्याने स्ट्रोकचा झटका येण्याची शक्यता असते.
त्याचबरोबर कड़क उन्हातून घरी आल्यावर लगेच हात, पाय धुवू नका. त्या आधी किंवा आंघोळ करण्या आधी किमान अर्धा तास थांबा, त्यानंतरच अंघोळ करा, असे न केल्यास त्या व्यक्तीला स्ट्रोकचा झटका येण्याची शक्यता असते, असे ही काही आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले आहे?
PM Vishwakarma Yojna उद्योगासाठी एक ते तीन लाखापर्यंत मिळेल कर्ज! पहा कोणती आहे योजना!
आज प्रत्येक तरुणाने शिक्षण घेणे गरजेचे आहे पण त्याच बरोबर व्यावसायिक शिक्षण घेणे हे पण गरजेचे आहे. सरकार हे गरीब व गरजू होतकरू तरुणांसाठी वेगवेगळे योजना राबवत आहे त्यामधील एक प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आहे या योजनेमुळे गरीब व गरजू होतकरू नागरिकांना साठी आपला स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी शासन प्रशिक्षण तर देतच आहे परंतु कर्ज देखील देत आहे. चला तर मग आपण ही योजना काय आहे हे समजून घेऊ.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी श्रमिक पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्जदारांच्या त्रिस्तरीय पडताळणी होईल व नंतर त्यांना योजनेचा लाभ दिला जाईल. ग्रामीण आणि शहरी संस्थांसाठी पडताळणीसाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. ग्रामीण भागात पडताळणीची जबाबदारी ग्रामविकास आणि पंचायती राज विभागाकडे देण्यात आली आहे. तर शहरी भागात प्रथम स्तरावरील पडताळणी कार्यकारी अधिकारी करणार आहेत.
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे फायदे
या योजनेअंतर्गत पारंपरिक व्यवसायाशी निगडित तरुण कारागिरांना वेगवेगळ्या अठरा व्यवसाय मध्ये एका आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षण दरम्यान त्यांना प्रतिदिवास ₹ ५००/- भत्ता दिला जातो. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना टूल किट खरेदी करण्यासाठी ₹ २०,०००/- दिले जातील. त्याच बरोबर त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेमार्फत एक लाख ते तीन लाख रुपया पर्यंत चे कर्ज हमी शिवाय दिले जाईल.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने अंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी व्यक्ती संबंधित 18 क्षेत्रांमधील असणे आवश्यक आहे.
१. सुतार २. बोट किंवा नाव बनवणारे ३. लोहार ४. टाळे बनवणारे कारागीर ५. सोनार ६. कुंभार ७. शिल्पकार ८. मेस्त्री ९. मच्छिमार १०. टूल किट निर्माता ११. दगड फोडणारे मजूर १२. मोची कारागीर १३. टोपली, चटई, झाडू बनवणारे. १४. बाहुली आणि इतर पारंपारिक खेळणी उत्पादक. १५. न्हावी १६. हार बनवणारे १७. धोबी १८. शिंपी
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता काय आहे
अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. अर्जदार विश्वकर्मा योजनेअंतर्गत 18 क्षेत्रापैकी एकामधील असावा. अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 50 वर्षांपेक्षा कमी असावे. मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या 140 जाती पैकी एक असणे आवश्यक आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
आधार कार्ड. पॅन कार्ड. जात प्रमाणपत्र. उत्पन्न प्रमाणपत्र. पत्त्याचा पुरावा. ओळखपत्र. बँक पासबुक. पासपोर्ट आकाराचा फोटो. चालू मोबाईल नंबर.
या अधिकृत संकेतस्थळावर जा. मुख्यपृष्ठावर पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान योजना हा पर्याय असेल. येथे Apply Online पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्ही तुमची नोंदणी पूर्ण करा. नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर SMS येईल. यानंतर, नोंदणी फॉर्म पूर्णपणे वाचा आणि योग्य पद्धतीने भरा. भरलेल्या फॉर्मसह सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा. आता फॉर्ममध्ये प्रविष्ट केलेली माहिती पुन्हा एकदा तपासून बरोबर आहे का याची खात्री करूनच सबमिट करा.
Rain पंजाबराव डक यांचा अंदाज! पुढील तिन दिवसात काही भागामध्ये होणार मुसळधार पाऊस?
सध्या उन्हाचा तडाखा जाणवत असताना अधून मधून वातावरणात बदल होत असून अचानक काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडतो आहे.
हवामान अंदाजक पंजाबराव डक यांनी हवामाना बद्दल महत्वाची माहिती दिली आहे. हवामान अंदाजक पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये २० एप्रिल पर्यंत अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
या भागामध्ये होणार अवकाळी पाऊस
गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या हवामानामध्ये अचानक बदल होताना दिसत आहे. या अचानक होणाऱ्या बदलामुळे शेतकऱ्याचे नुकसान होताना पाहायला मिळते आहे. हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी अशातच एक मोठं विधान केले आहे की २० तारखे पर्यंत अवकाळी पावसाचा जोर कायम राहणार आहे. तरी शेतकऱ्यांनी व नागरिकांनी योग्य ति खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे.
मध्य महाराष्ट्र, कोकण व मराठवाडा येथे २० तारखेपर्यंत दाट शक्यता वर्तवली आहे. तसेच पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मराठवाडा विभागात देखील पोषक वातावरण तयार झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच दुसरीकडे पश्चिममहाराष्ट्रातील पुणे सातारा या भागात देखील पावसाची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
याच दरम्यान बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जळगाव, नाशिक, जालना, मुंबई, हिंगोली, या भागामध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे सदर भागातील शेतकऱ्यांना सावध राहण्याचे पंजाबराव डक यांनी केले आहे. तसेच राज्यातील काही भागांमध्ये दिवसा तापमान देखील पूर्वीपेक्षा जास्त वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे. नागरिकांनी उन्हामध्ये घराबाहेर पडू नये असे प्रशासनाच्या वतीने आव्हान करण्यात आलेले आहे.