Health Insurance च्या या नियमात झाला बदल?ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाची बातमी!

Health Insurance च्या या नियमात झाला बदल?
ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाची बातमी!

धकाधकीचे जीवनामध्ये वाढत्या आजारचे प्रमाण पाहता आरोग्य विमा हा सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.

ज्येष्ठ नागरिकासाठी एक अत्यंत महत्वाची व आनंदाची बाब म्हणजे आता वयाच्या ६५ वर्षा नंतर सुद्धा आरोग्य विमा पॉलिसी चे कवच मिळणार? कारण आता आरोग्य विमा पॉलिसी मध्ये बदल करण्यात आला आहे. आत्ता पर्यंत आरोग्य विमा पॉलिसी कंपन्या वयाचे कारण सांगून ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विमा पॉलिसी नाकारत होते परंतु आता IRDAI ने नियम शिथिल केल्या मुळे वयाच्या ६५ वर्षानंतर सुद्धा आरोग्य विमा कवच मिळणार आहे.

आता आरोग्य विमा काढताना वयाची अट नाही. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देखील विमा काढता येईल. तसेच काही गंभीर आजार असल्यास त्या व्यक्तीला आरोग्य विमा नाकारता येणार नाही हे नवीन नियम १ एप्रिल २०२४ पासून लागू होतील.

हृदयरोग, कर्करोग, एडस्, किडनी विकार या सारख्या आजारांना देखील विमा नाकारता येणार नाही वय कितीही असले तरी विमा काढता येईल तसेच आरोग्य विम्याचा प्रतीक्षा कालावधी हा ४८ महिन्या वरून ३६ महिने करण्यात आला आहे. यामुळे विमा कंपनीच्या मनमानीला चांगलाच चाप बसला आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक समाधानाची बाब म्हणावी लागेल.

1693414770721

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *