SSC, HSC दहावी बारावीचा निकाल या तारखेला लागणार?

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार दहावी आणि बारावीचा निकाल मे महिन्यामध्ये लागण्याची शक्यता? आता निकाल पाहता येणार डिजीलॉकर वरून?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकाला ( SSC HSC EXAM RESULT 2025) बाबत मंडळाने दिलेल्या माहितीनुसार मोठी अपडेट समोर येत आहे. बारावीचा निकाल हा गतवर्षी २१ मे ला लागला होता परंतु यावर्षी निकाल हा निकाल १० मे अगोदरच लागेल, त्याचप्रमाणे दहावीचा निकाल हा गतवर्षी २७ मे ला लागला होता परंतु यावर्षी हा निकाल १५ मे अगोदरच लागेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यंदाच्या वर्षी मंडळाने निकाल पाहण्यासाठी एक नवीन पद्धत विद्यार्थ्यांसाठी दिली आहे. डिजीलॉकर ॲप च्या माध्यमातून निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. महामंडळाच्या संकेतस्थळावर एकाच वेळी लाखो विद्यार्थी निकाल पाहत असतात अशा वेळेस साईटवर खूप लोड योतो व सर्वांना निकाल पाहता येत नाही. त्याकरिता मंडळ हा निकाल डिजीलॉकर ॲप वर उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.? दहावी आणि बरावीच्या दोन्ही मिळून तब्बल एकवीस लक्ष विद्यार्थांचा निकाल डिजीलॉकर ॲप च्या माध्यमातून पाहायला मिळणार असल्याची शक्यता आहे.

a white hand with a black background
1693414770721 1

MMLBY पहा लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार?

लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीये पर्यंत होणार महिलांच्या खात्यात जमा?

सध्या महाराष्ट्र मध्ये लाडकी बहिणी योजना (Mukhyamantri Ladki Bahin Yojna) चर्चेत असून या योजनेचा दहावा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता हा आणखीन महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या नसून लाभार्थी महिला भगिनी या हप्त्याची वाट चातकासारखी पाहताना दिसून येत आहेत. खरं पाहता एप्रिल महिन्याचा हा शेवटचा आठवडा आहे. तरी देखील आणखीन लाभार्थी महिलांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा झालेले नाहीत.

एप्रिल महिन्याचा लाडक्या बहिणीचा पंधराशे रुपये हप्ता हा लवकरात लवकर म्हणजेच अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर 30 तारखेच्या अगोदर लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती महिला व बाल विकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.?

विधानसभा निवडणुकीनंतर लाडक्या बहिणी योजनेची अर्ज पडताळणी चालू केलेली असून आणखीनही चालूच आहे. या योजनेच्या निकषांनुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. जसेकी ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार पेक्षा अधिक आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच पात्र महिलांच्या खात्यावर हे पंधराशे रुपये जमा होणार आहेत.

Ration Card KYC रेशन कार्ड केवायसी करण्याची शेवटची तारीख. पहा कोणती आहे?

रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी. रेशनकार्ड ई-केवायसी करण्यासाठी मिळाली मुदत वाढ. ही अंतिम मुदतवाढ असल्याचा दावा?

Ration Card KYC रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ई-केवायसी करण्यासाठी रेशन कार्ड धारकास ही शेवटची संधी असल्याचे सांगितले जात आहे? या आधी रेशन कार्ड धारकांसाठी ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत ही ३१ मार्च २०२५ ही होती परंतु आता याला एक महिन्याची मुदत वाढ मिळाली असून ३० एप्रिल २०२५ पर्यंत ई-केवायसी करू शकता.

आता केलेली मुदतवाढ ही चौथ्यांदा केलेली मुदतवाढ आहे. असे विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ही शेवटची मुदतवाढ असल्याचे सांगितले जात आहे? यानंतर रेशन कार्ड केवायसी करण्याकरिता मुदतवाढ मिळणार नसून 30 एप्रिल पर्यंत सर्व रेशन कार्डधारकांनी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.

Anganwadi Recruitment अंगणवाडी सेविका पदाची मोठी भरती? १८८८२ पद भरणार! पहा काय आहे पात्रता!

पहा काय कागदपत्र लागतात, काय आहे पात्रता, काय आहेत नियम व अटी. Anganwadi Sevika Recruitment 2025

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यान साठी एक आनंदाची बातमी. महिला व बाल विकास विभागा अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस या दोन्ही मिळून १८ हजार ८८२ पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये अंगणवाडी सेविका ५६३९ तर मदतनीस १३२४३ पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती प्रक्रिया मोठी भरती प्रक्रिया असणार आहे. यामध्ये लाखोंच्या संख्येने अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार ७५ हजार पद भरती करणार आहे त्यापैकी अठराहजार पदभरती ही महिला व बालविकास विभाग करीत आहे असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. 

भरती प्रक्रिया ही संपूर्ण पारदर्शक पद्धतीने होणार असून उमेदवारांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडण्याचे आवाहन हे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. राज्यातील अंगणवाड्यांमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदासाठी वेगवेगळ्या जिल्हा प्रशासनाकडून स्थानिक पातळीवर तशा प्रकारच्या जाहिराती काढण्यात आल्या आहेत. १४ फेब्रुवारी ते २ मार्च २०२५ या कालावधीत मुख्य सेविका या पदाची सरळ सेवा व निवडीद्वारे ३७४ पदभरतीची परीक्षा होणार आहे. या पद भरतीसाठी लागणारी कागदपत्रे, पात्रता, नियम व अटी आपण खाली पाहणार आहोत. 

अर्जा सोबत जोडावी लागणारी कागदपत्रे.

• लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र 

• आधार कार्ड

• रहिवासी प्रमाणपत्र तहसील कार्यालयाचे (अनिवार्य)

• सक्षम प्राधिकारी यांचे विधवा प्रमाणपत्र ( लागू असल्यास) 

• सक्षम प्राधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र ( लागू असल्यास) 

• शैक्षणिक अहर्ता/ पात्रता प्रमाणपत्र, गुणपत्रके. 

• अंगणवाडी सेविका/मदतनीस यांची किमान आर्हता १२ वी (HSC) उत्तीर्ण आवश्यक आहे उमेदवार पदवी/पदव्युत्तर इत्यादी बाबतचे गुणपत्रक व प्रमाणपत्र यांच्या सत्य प्रति जोडणे.

• शासकीय / अनुदानित संस्थेत दाखल असलेल्या अनाथ अर्जदाराचे बाबतीत सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र. (लागू असल्यास)

• डी.एड. पदविका, बी.एड. पदविका असल्यास त्याचे गुणपत्रक व प्रमाणपत्रक जोडणे.

• उमेदवार MS-CIT उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र जोडणे.

• अंगणवाडी सेविका/अंणवाडी मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका म्हणुन कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र. (लागु असल्यास)

• अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे स्वतः साक्षांकित (Self Attested) केलेली असणे आवश्यक आहे.

अधिकची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील अधिकृत संकेत स्थळावर जा.

https://icds.gov.in

.

a white hand with a black background
1693414770721 1

RTE खुशखबर! १४ जानेवारी पासून आरटीई प्रवेश नोंदणी होणार सुरू?

RTE Admission Open 2025 2026

आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थांसाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवी पर्यंत इंग्रजी शाळांमध्ये २५% राखीव जागा मध्ये मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध केली जाते. या संबंधित विद्यार्थ्यांचे शुल्क सरकारमार्फत शाळांना दिले जाते.

यावर्षीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी १८ डिसेंबर २०२४ ला शाळा नोंदणी सुरू झाली होती. जवळपास शाळा नोंदणी प्रक्रिया ही पूर्ण झाली असून यंदा जवळपास साडेनऊ हजार शाळांची नोंदणी झाली आहे. एक लाखाहून अधिक जागा प्रवेशासाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

शाळा नोंदणीसाठी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदत दिली होती परंतु अपेक्षित नोंदणी न झाल्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने ०४ जानेवारी पर्यंत शाळा नोंदणीला मुदत वाढ देण्यात आली होती. आता शाळा नोंदणी ही पूर्ण झाली असून १४ जानेवारी पासून विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार आहे? असे प्राथमिक शिक्षण संचालनालया कडून अंदाज व्यक्त केला जात आहे.

आज RTE पोर्टलवर दिसत असलेल्या आकडेवारी नुसार ८ हजार ८४६ शाळांची नोंदणी झाली असून १ लाख ८ हजार ८५९ जागा उपलब्ध आहेत.

RTE पोर्टल वर जाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

a white hand with a black background

https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new

आरटीई प्रवेशाच्या सर्व अपडेट साठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा!

a white hand with a black background
1693414770721 1

MMLBY नवीन सरकारने लाडक्या बहिणींचे टेंशन वाढवले? या महिलांची योजना होणार बंद?

महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या योजने बद्दल दिली मोठी उपडेट

लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी उपडेट समोर येत आहे. लाडक्या बहिणींना धक्का बसण्याची शक्यता. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजने बद्दल मोठी माहिती दिली आहे. राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखा पेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक हातभार लागावा यासाठी हि योजना सरकारने चालू केली होती. परंतु आता या योजनेतून काही महिलांना वगळले जाऊ शकते. या योजनेतील ज्या महिलांचे अर्ज पात्र झाले आहेत अशा महिलांना डिसेंबर महिन्या पर्यंतचे सहा हप्त्याचे पंधराशे रुपये महिन्या प्रमाणे सर्व पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत.

पहा काय म्हणाल्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे!

मुख्यामंत्री लाडकी बहीण योजने बाबत पाच प्रकारच्या तक्रारी ह्या महिला व बालकल्याण विभागाकडे आल्या आहेत. वेगवेगळ्या बाजुने आम्ही या तक्रारीची पडताळणी करणार आहोत. त्यातील काही तक्रारी या स्थानिक प्रशासनाकडून आलेल्या आहेत, तर काही लाभार्थी महिलांनी पत्र लिहून या योजनेसाठी आता आम्ही पात्र नसल्याची माहिती दिली आहे. तक्रारी प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची पडताळणी होणार आहे. मात्र लाडकी बहीण योजनेच्या मूळ जीआर मध्ये कोणताही बदल होणार नाही असे मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.

पहा कोण कोणत्या अर्जाची होणार पडताळणी?

  1. चार चाकी वाहनं असलेल्या महिलांच्या अर्जांची होणार पडताळणी.
  2. ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तरी देखील या योजनेचा फायदा घेत आहेत अशा अर्जांची होणार छाननी.
  3. एकच महिलेने दोन अर्ज दाखल केले आहेत अशा अर्जांची होणार छाननी.
  4. लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या अर्जांची होणार पडताळणी.
  5. आधार कार्डवर आणि कागद पत्रावर नावांमध्ये तफावत असलेल्या अर्जाची देखील पडताळणी होणार अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

तसेच अर्ज पडताळणी मध्ये ज्या लाभार्थी महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, किंवा त्यांच्या कडे चारचाकी वाहनं आहेत, अशा महिलांना आता या योजनेतून वगळलं जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याचा फटका हा राज्यातील अनेक लाडक्या बहिणींना बसू शकतो.

a white hand with a black background
1693414770721 1

MMLBY लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी! अर्ज भरण्यासाठी मिळाली मुदत वाढ!

ज्या महिलांनी अर्ज केला नव्हता त्यांच्यासाठी आणखी एक संधी!

1001078762

Mukhyamantri Ladki Bahin Yojna राज्यात आतापर्यंत २ कोटी ३० लाख महिला भगिनींना त्यांच्या खात्यामध्ये पाच महिन्याचे एकूण सात हजार पाचशे रुपये सरकारकडून जमा करण्यात आले आहेत. व ज्या महिलांना अद्याप पर्यंत लाडकी बहिण योजनेचा अर्ज केलेला नाही अशा महिलांना राज्य सरकारने विजयादशमीच्या पूर्व संधेला आनंदाची बातमी दिली आहे. लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरण्याची मुदत आता राज्य सरकारने १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत वाढवली आहे. मात्र हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविका मार्फतच भरावे लागणार आहेत. अशी सूचना शासनाकडून मिळाली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीला आता नव्याने अर्ज भरण्याची संधी प्राप्त झाली आहे. उर्वरित चार दिवसात अर्ज करून या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

राज्यातील लाडकी बहीण योजनेला मिळणार प्रचंड प्रतिसाद पाहून राज्य सरकारने या योजनेला मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी ३० सप्टेंबर ही योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत देली गेली होती. मागील महिन्यातही लाखो महिलांना आपले अर्ज दाखल केले होते. ज्या महिलांनी अर्ज सादर केले होते. त्यांना या योजनेचा लाभही मिळण्यास सुरुवात झाली होती. रक्षाबंधन सणाचा मुहूर्त साधत राज्य सरकारने या योजनेच्या पहिल्या हफ्याच्या वितरणास सुरुवात केली होती. तेव्हापासून आजपर्यंत राज्यातील तब्बल २ कोटी ३० लाख महिला या योजनेत पात्र ठरल्या असून त्यांच्या बँक खात्यावर DBT मार्फत पैसेही जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बहुतांश महिलांच्या बँक खात्यात आत्तापर्यंत पाच हप्त्याने ७५००/- रुपये जमा झाले आहेत. आता उर्वरीत महिलांनाही लाडकी बहीण योजनेसाठी १५ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. मात्र त्यासाठी केवळ अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. 

click here
1693414770721

PM Kisan कृषिमंत्री यांनी दिली माहिती! ९२ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर होणार ४ हजार रुपये जमा.

पहा कधी होणार जमा

1001034849

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिनांक ०५ ऑक्टोबर रोजी ४ हजार रुपये जमा होणार, आहेत अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली असून पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या दोन्ही योजनांचे ऑगस्ट व नोव्हेंबर चे हप्ते जमा होणार आहेत.

उद्या दिनांक ५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाशिम येथील बंजारा समाजाची काशी आलेल्या पोहरादेवी येथे देवीच्या दर्शना साठी येणार आहेत. तेथील होणाऱ्या समारंभा मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचा हप्ता ४ हजार रुपये जमा करणार आहेत.

देशातील शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) ही योजना फेब्रुवारी २०१९ पासून चालू केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास ( पती, पत्नी व त्यांची १८ वर्षा खालील अपत्ये ) यांना रु.२०००/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू.६०००/- हे त्यांच्या आधार व डीबीटी (DBT) संलग्न चालू बँक खात्यात लाभ जमा करण्यात येतो आहे. पीएम किसान योजने अंतर्गत दिनांक ३० सप्टेंबर २०२४ अखेर राज्यातील जवळपास १.२० कोटी शेतकरी कुटुंबांना एकूण १७ हप्त्या मध्ये सुमारे रू.३२ हजार कोटीचा लाभ जमा आत्तापर्यंत झालेला आहे.

click here
1693414770721

Solar Krushi Pump मागेल त्याला सौर पंप योजनेचा अर्ज इथे व असा भरा!

WhatsApp Image 2024 09 25 at 1.49.01 PM

दिवसेंदिवस विजेची वाढती मागणी पाहता सरकारने वीज उत्पादनाची वेगवेगळे पर्याय शोधले असून सद्या सौर ऊर्जेच्या वापरावर भर देण्यात आला आहे त्या साठी सरकार अनुदान देत आहे. सौर उर्जेचे महत्व लक्षात घेता राज्य सरकार कडून महाराष्ट्रात २०१५ पासून शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंपाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. यापूर्वी अटल शेतकरी कृषी सौर पंप योजना तसेच मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजना राबविण्यात आल्या होत्या, तसेच प्रधानमंत्री कुसुम घटक ब या योजनेअंतर्गत राज्यात ९ सप्टेंबर २०२४ पर्यंत २ लाख ६३ हजार १५६ कृषी सौर पंप बसवण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांना या सौर पंपाचा मिळालेला लाभ तसेच शेतकऱ्यांचा या सौर पंपा बाबतचा प्रतिसाद लक्षात घेता मागेल त्याला सौर पंप देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

➧ या शेतकऱ्यांना मिळेल प्राधान्य

महाराष्ट्र राज्य सरकारने २०२४ च्या अर्थसंकल्पात मागेल त्याला कृषी सौर पंप या योजनेची घोषणा केली असून या अंतर्गत राज्यातील जवळपास आठ लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना कृषी सोलर पंप देण्याचा मानस सरकारचा आहे. या अगोदर पीएम कुसुम अंतर्गत ही योजना राबविण्यात येत होती. परंतु सध्या शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात या सौर कृषी पंपाची मागणी होताना दिसून येत आहे. परंतु ज्या शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्रोत आहे किंवा ज्या शेतकऱ्याकडे सिंचना करीता पारंपरिक पद्धतीचा वीज पुरवठा नाही अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला कृषी सौर पंप योजना राबविण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्याने यापूर्वी महावितरण कडे पैसे भरून कृषी सौर पंप मिळालेला नाही अशा प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

➧ असा करावा अर्ज

मागेल त्याला कृषी सौर पंप या योजनेचा अर्ज करण्यासाठी महावितरण तर्फे स्वतंत्र वेब पोर्टल तयार केले आहे. त्या वेब पोर्टल वर जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index.php या वेबपोर्टलवर गेल्यानंतर लाभार्थी सुविधा या पर्यायावर जाणे व नंतर अर्ज करा या पर्यायावर गेल्यानंतर अर्ज ओपन होईल तो अर्ज संपूर्ण भरावा व आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करावीत व नंतर अर्ज सबमिट करावा.

➧ लागणारी आवश्यक कागदपत्र

➤ आधार कार्ड
➤ ७/१२ उतारा
➤ जात प्रमाणपत्र ( अनुसूचित जाती/जमातीच्या लाभार्थ्यांसाठी )
➤ अर्जदार स्वतः शेतजमिनीचा मालक एकटा नसेल तर इतर हिस्सेदारांचा/मालकांचा नाहरकत दाखला देणे आवश्यक आहे.
➤ पाण्याचा स्त्रोत डार्क झोनमध्ये असल्यास भुजल सर्वेक्षण विभागा मार्फत ना हरकत प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
➤ संपर्कासाठी मोबाईल क्रमांक. ईमेल (असल्यास)
➤ पाण्याची खोली व त्याची माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे.

click here
1693414770721

MLBY लाडक्या बहिणीच्या तिसऱ्या हप्त्याची तारीख ठरली!पहा कधी मिळणार चार हजार पाचशे रुपये!

राज्य सरकारच ठरलं या दिवशी वितरित होणार तिसरा हप्ता. याबाबत अदिती तटकरे यांनी दिली माहिती. Mukhyamatri Mazi Ladki Bahin Yojna

WhatsApp Image 2024 09 24 at 12.27.18 PM

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण हे येत्या २९ सप्टेंबर २०२४ रोजी होणार आहे. अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. या योजनेस पात्र असणाऱ्या महिलांना प्रतीमहा पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. ज्या महिलांना मागील दोन हप्ते मिळालेले आहेत त्यांना तिसऱ्या हप्त्याचे पंधराशे रुपये मिळणार तर ज्या महिलांना आणखीन पैसे मिळालेले नाहीत त्यांना तिन्हीही हप्त्याने एकत्रित रुपये चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत.

राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या.

राज्य सरकारच्या या निर्णया बाबत राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा होणारा तिसरा कार्यक्रम २९ सप्टेंबर रोजी रायगड येथे होणार असून हा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात सप्टेंबरपर्यंत आलेल्या अर्जाचा लाभ हा लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. अनेक महिलांना अर्जात त्रुटी राहिल्यामुळे अद्याप पर्यंत या योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे या तिसऱ्या हप्त्यात अशा महिलांना लाभ दिला जाणार आहे. या तिसऱ्या हप्त्यात एकूण दोन कोटी महिलांना लाभ देण्यात येईल अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. 

click here
1693414770721

.