Admission अकरावी प्रवेश झाला सुरू. या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार.

अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्र लागणार? अर्ज कसा करायचा?

13 मे रोजी दहावीचा निकाल लागला आणि आता पुढे काय? हा प्रश्न सर्व विद्यार्थी आणि पालक यांना पडलेला आहे. सर्वत्र विद्यार्थी आणि पालक यांची पुढील प्रवेशासाठी लगबग पाहायला मिळत आहे. ज्या विद्यार्थ्यांना अकरावी साठी प्रवेश घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हि बातमी नक्कीच महत्वाची असणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ अकरावी प्रवेशासाठी आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. चला तर मग पाहूया ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहेत.

यंदा प्रथमच अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही राज्यभरात केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील ९ हजार २९४ कनिष्ठ विद्यालयाने नोंदणी केलेली आहे. २६ मे पासून प्रवेश नोंदणी अर्ज भरण्यासाठी सुरवात होत आहे. https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र पुढे पाहुयात.

➧ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र.

  • दहावी उत्तीर्ण गुणपत्रिका. (SSC Pass Marksheet)
  • शाळा सोडल्याचा दाखला. ( School Leaving certificate)
  • आधार कार्ड. (Aadhar card)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो. (Passport size photo)
  • अधिवास प्रमाणपत्र. (Domicile certificate)
  • जात प्रमाणपत्र. (Cast Certificate)
  • नॉन क्रिमी लेयर (Non-Creamy layer)
  • अपंगत्व प्रमाणपत्र. (diciblity certificate)
    वरीलपैकी आपणास लागू असलेले कागदपत्र/ प्रमाणपत्र तयार ठेवा.

➧ अर्ज कसा करावा?

https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन होम पेज वरचा न्यू रजिस्ट्रेशन चा पर्याय निवडा. तो पर्याय निवडल्यानंतर आपले नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी हे सर्व वैयक्तिक माहिती अचूकपणे भरा व त्यानंतर दहावीच्या परीक्षेचा सीट नंबर, उत्तीर्ण झालेले वर्ष व शिक्षण मंडळ कोणते आहे त्याची माहिती भरा. त्यानंतर पुढे विचारलेल्या अधिक प्रश्नांची माहिती अचूकपणे भरा. व त्यानंतर आपला पासवर्ड सेट करा. व नोंदणी फार्म पूर्णपणे भरा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मिळालेला लॉगिन आयडी, पासवर्ड व अर्ज क्रमांक सुरक्षितपणे जपून ठेवा. कारण पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी तो लागणार आहे.

a white hand with a black background
1693414770721 1

EWS, SEBC, OBC विद्यार्थिनींसाठी मोठी घोषणा?

Maharastra Government News Education News महाराष्ट्र राज्य सरकारने EWS, SBEC, OBC, विद्यार्थिनी साठी मोठी घोषणा केली आहे? मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय?

1000722884

EWS, SEBC, OBC विद्यार्थिनींसाठी मोठी घोषणा?

जसं जशी विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे तसं राज्यसरकार वेगवेगळ्या योजनाची घोषणा करताना पाहायला मिळत आहे आत्ताच मागील काही दिवसापूर्वी राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजनेची घोषणा केली आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने मंत्री मंडळाच्या बैठकीत विद्यार्थिनी साठी मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
EWS, SBEC, OBC विद्यार्थिनी साठी फीसमध्ये ५०% सवलत राज्य सरकार देत होते परंतु आता ही सवलत १००% देण्याबाबत काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे आढळून आले आहे व लवकरच त्याबाबतीत अधिकृत घोषणा केली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग, आणि इतर मागास प्रवर्गातील व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या र्विद्यार्थिनींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कात ५०% सूट दिली जात होती परंतु आता या शुल्कात वाढ करून ती १००% सूट दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थिनींना मोठा दिलासा मिळणार आहे.

click here
1693414770721