RTE प्रवेश पडले लांबणीवर, पहा का होतय उशीर!

.

1000657475

.

शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव 25% जागा भरणे हे लांबणीवर पडले आहे. कारण ही प्रक्रिया सध्या न्यायप्रविष्ठ असल्यामुळे न्यायालयामध्ये 12 जून रोजी सुनावणी होणार होती परंतु काही कारणास्तव ही सुनावणी पुढे ढकलली की 13 जून रोजी होईल असेल वाटले होते परंतु 13 जून रोजी ही सुनावणी झाली नसून ही सुनावणी आता दिनांक 18 जून रोजी होणार असून तोपर्यंत पालकांना प्रवेशासाठी वाट पहावी लागणार आहे.

सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी RTE २५% प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (लॉटरी) शुक्रवार दिनांक. ০७/০६/२০२४ रोजी झाली असून लकी ड्रॉ चा निकाल हा 18 जून नंतरच जाहीर होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.

RTE प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश अर्ज स्वीकारण्यात आलेले आहेत. राज्यातील ९ हजार २१७ शाळांत १ लाख ५ हजार ३९९ जागांवरील प्रवेशासाठी २ लाख ४२ हजार ९७२ अर्ज आलेले आहेत. आणि शिक्षण विभागा मार्फत प्रवेशासाठी ऑनलाईन लॉटरी काढलेली असली तरी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थांच्या पालकांना प्रवेशासाठी आणखीन काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण काही शाळा न्यायालयात गेल्या आहेत. या शाळांनी RTE २५% राखीव जागांवर इतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेले आहेत. त्यामुळे शाळांच्या प्रवेशाचे काय करायाचे? असा प्रश्न समोर आला आहे. त्यामुळे आता न्यायालयीन निकालानंतर हा प्रश्न सुटेल.

click here
1693414770721

PM Kisan Yojna पीएम किसान सन्मान योजनेच्या १७ व्या हप्त्यास मिळाली मंजुरी !

पहा जमा झाला का किसन सन्मान योजनेचा १७ वा हप्ता?

PM Kisan

.

लोकसभेचा निकाल लागून चार दिवसांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि कामाला सुुवातही केली आहे आणि शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी दिली ती म्हणजे शेतकरी सन्मान योजनेचा १७ वा हप्ता जमा करण्यास मंजुरी दिली आहे तरी शेतकऱ्याच्या खात्यात लवकरच १७ वा हप्ता जमा होणार आहे.

पीएम किसान सन्मान योजनेचा १७ वा हप्ता जमा करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिली असून त्याची एकंदरीत रक्कम ही २० हजार कोटी रुपये असून ही रक्कम एकूण ९.३ कोटी शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्याच्या खात्यात दर वर्षी एकूण सहा हजार रुपये जमा होत आहेत. ज्या शेतकऱ्याचे नाव या लाभार्थी यादी मध्ये असेल अशा सर्व शेतकऱ्याला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या १७ व्या हप्त्याचा लाभ मिळेल.

असा पहा घरबसल्या आपला १७ वा हप्ता जमा झाला का.

सर्वात अगोदर आपण या संकेतस्थळावर जावे व नंतर Pm kisan beneficiary status या पर्यायावर जाऊन आपला खाते क्रमांक/ आधार क्रमांक टाकून सबमिट करा व आपले स्टेटस पहा आपले नाव लाभार्थी यादी मध्ये आहे का नाही ते समजेल.

लाभार्थ्याचे इ केवायसी पूर्ण झालेली असेल तर लाभार्थ्यासारखं मिळण्यास काही अडचण नाही तसेच खात्यासोबत लाभार्थ्याचे आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे तरच खात्यात रक्कम जमा होइल. शेतकऱ्यास पीएम किसान सन्मान योजने संबंधी काही अडचण येते असल्यास शेतकऱ्यांनी या 1800-115-5525 हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.

इथे पहा आपला १७ वा हप्ता जमा झाला का

click here

pmkisan.gov.in

.

click here
1693414770721

Maharastra Rain Alerts पहा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट घोषित?

मुंबई पुणे सह काही भागात मुसळधार पाऊस, पुढील २४ तासात महाराष्ट्रात पाऊस!

1000646942

Maharastra Rain Alerts पहा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट घोषित?

पुढील २४ तासात मुंबईत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पुढील चार दिवस राज्यातील विविधभागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

कोकण, मध्यमहाराष्ट्रमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे सध्या या भागामध्ये पाऊस सुरू आहे. पुढील २४ तासा मध्ये मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे आज पासून पुढील चार दिवस राज्यातील विविध भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची दाट शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

आयएमडीच्या माहिती नुसार आज ९ जून पासून मान्सूनचा प्रवास झपाट्याने होणार असल्याची माहिती दिली आहे, त्यामुळे राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी उत्तर कोकण, दक्षिण कोकण व मध्य महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट घोषित करण्यास आला आहे.

विदर्भ, मराठवाडा व उत्तर मध्य महाराष्ट्रात ही मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर उद्या दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तरी शेतकऱ्यांनी शेतीतील पेरणी पूर्व सर्व कामे लवकरात लवकर करून घ्यावीत. पाऊस हा भरपूर प्रमाणात पडणार असला तरी शेतकऱ्यांनी खरी हंगामाची पेरणी करताना गरबड करू नये असा सल्ला कृषी विभागा मार्फत देण्यात आला आहे.

सद्या पुण्यामध्ये जोरदार पाऊस पडत असून मुंबईतही पावसाचे आगमन झालेले आहे. येत्या काही तासातच मुंबईसह उपनगर, अहमदनगर, पालघर, सोलापूर, सांगली, नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मराठवाड्यातील जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर,वाशिम, चंद्रपूर या जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी शेतकऱ्यांनी व नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन देखील आयएमडी कडून करण्यात आलेलं आहे.

click here
1693414770721

RTE २५% प्रवेशाची सोडत (लॉटरी) आज !

.

1000641519

.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शालेय शिक्षण विभाग सुमारे दहा ते अकरा वर्षांपासून सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी RTE २५% आरक्षित जागांवर प्रवेश दिला जात आहे. परंतु राज्य शासनाने यावर्षी कायद्यात बदल करून केवळ सरकारी शाळांमध्ये RTE अंतर्गत प्राधान्याने प्रवेश देण्याचे धोरण निश्चित केले. सरकारी शाळा उपलब्ध नसतील तरच खाजगी स्वयंम अर्थसहाय्यीत शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल, अशी नियमावली तयार केली. यावर विविध पालक संघटनांनी आवाज उठवला. त्यात काही संघटनांनी न्यायालया पर्यंत देखील धाव घेतली. त्यावर न्यायालयाने शासनाच्या अधीसूचनेल सूचनेला स्थगिती दिली आहे. राज्य शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यातील RTE २५% आरक्षण जागांच्या प्रवेशा संदर्भात विनाअनुदानित शाळांना वगळण्याबाबत काढलेल्या अधीसूचनेला आवाहन देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली गेली होती. न्यायालयात याबाबत सुनावणी घेण्यात आली त्यात राज्य शासनाने ९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेला स्थगिती देण्यात आली. व नंतर राज्य शिक्षण विभागाने पहिल्या सारखीच प्रवेश प्रक्रिया परत एकदा नव्याने सुरू केली.

ही प्रवेश प्रकिया पुन्हा नव्याने शुक्रवार दिनांक १७ मे २०२४ पासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली होती व दिनांक ३१/०५/२०२४ पर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार होते. परंतु राज्य शिक्षण विभागाने प्रवेश अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस वेळ वाढवून दिला होता.  दिनांक ०४/०६/२०२४ पर्यंत प्रवेश अर्ज भरण्यास मुदत वाढ मिळाली होती.

सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी RTE २५% प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (लॉटरी) शुक्रवार दिनांक. ০७/০६/२০२४ रोजी सकाळी ११.०० वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे येथे काढण्यात येणार आहे. सदर सोडतचे थेट प्रक्षेपण व्ही.सी द्वारे करण्यात येणार आहे. आपणास ऑनलाईन या कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरिता https://youtube.com/live/bNgUW9iKSXO?feature=share लिक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी सर्व पालक या लिंक वर जाऊन ऑनलाइन सदर सोडतचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.

सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी RTE २५% प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (लॉटरी) शुक्रवार दिनांक. ০७/০६/२০२४ रोजी सकाळी ११.०० वाजता महाराष्ट्रराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे येथे काढण्यात येणार आहे. सदर सोडतचे थेट प्रक्षेपण व्ही.सी द्वारे करण्यात येणार आहे. आपणास ऑनलाईन या कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरिता https://youtube.com/live/bNgUW9iKSXO?feature=share लिक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी सर्व पालक या लिंक वर जाऊन ऑनलाइन सदर सोडतचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांची लॉटरी 7 जूनला काढण्यात येणार आहे. मात्र या लॉटरीचा निकाल तातडीने जाहीर न करता न्यायालयाच्या निर्देशानुसार 13 जूनला जाहीर केला जाईल, अशी माहिती राज्य सरकारने बुधवारी दिली आहे.

ऑनलाइन सोडतचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी खालील लिंक वर जा.

click here

MSRTC Anniversary १ जून एस टी (लालपरी) चा ७६ वा वर्धापन दिन!

खेड्याला शहरापर्यंत जोडणारी जीवनवाहिनी एस टी चा आज ७६ वा वर्धापनदिन संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा होत आहे.

1000625928

MSRTC Anniversary १ जून एस टी (लालपरी) चा ७६ वा वर्धापन दिन!

.

१ जून १९४८ रोजी सूरवात झाल्या पासून दर वर्षी एस टी चा वर्धापन दिन साजरा होत आहे आज १ जून २०२४ रोजी एस टी ७६ वर्षाची झाली असून ७६ वा वर्धापन दिन महाराष्ट्रभर सर्वच बसस्थानकावर प्रवाशी व कर्मचारी बांधवांना साखर पेढे वाटून तसेच शुभेच्छा देऊन साजरा केला जाणार आहे.

लालपरी म्हटलं की लहानांपासून थोरांपर्यंत आपलीशी वाटणारी. खेड्या पासून शहराला जोडणारी जीवनवाहिनी. पुणे – अहील्यानगर (अहमदनगर) मार्गावर १ जून १९४८ रोजी एस टी ची पहिली बस धावली आणि त्या दिवसापासून एस टी च्या प्रवासाला सुरुवात झाली. आणि आता सर्वत्र महाराष्ट्रभरच नव्हे तर अनेक राज्य एस टी प्रवास करत आहे. केवळ ३२ बेडफोर्ड बसेस पासून सुरू झालेला हा प्रवास आज ७६ वर्षात १५ हजार बसेस पर्यंत पोहचला आहे. या बसेस च्या माध्यमातून महाराष्ट्रभर ५६० पेक्षा ही जास्त बसस्थानकातून रोज सरासरी ५५ लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते आहे.

महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, स्वातंत्र्य सैनिक, तसेच पत्रकार अशा ३० पेक्षाही जास्त समाज घटकांना एस टी च्या प्रवाशी सेवेमध्ये राज्य शासन मार्फत सवलत दिली जात आहे. तसेच शालेय सहली साठी पण विशेष सवलत देण्यात येत आहे. याबरोबर दिवाळी, गणेश उत्सव, आषाढी, कार्तिकी यात्रा, अशा अनेक सणावाराच्या निमित्ताने नियमित तसेच ज्यादा फेऱ्याचे नियोजन करून प्रवाशांची सोय करत आहे. तसेच लग्न समारंभ, विविध शासकीय मोहत्सव व मेळावे यासाठी देखील सेवा पुरवते आहे.

दिवसेदिवस एस टी देखील कात टाकत चालली असून डिजिटल जगाबरोबर नवनवीन सेवा व सुविधा देत आहे. आत्ताच मागील काही दिवसामध्ये एस टी ने अँड्रॉइड तिकीट मशीन आणल्या असून यामध्ये UPI पेमेंट ची सुविधा चालू केली आहे तसेच ऑनलाइन आरक्षण करण्याची देखील सुविधा चालू आहे.

1000626181

लालपरीचा रंजक इतिहास

देश स्वतंत्र झाल्यानंतर देशाचा स्वतंत्र कारभार सुरु होऊन एक वर्षही झाले नव्हते. त्याच काळात नवीन ध्येय-धोरणे आखली जात होती. त्याचाच एक भाग म्हणून खासगी वाहतूक व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यावेळी बॉम्बे स्टेट होते. १ जून १९४८ रोजी अहमदनगर माळीवाडा येथील लक्ष्मी मातेच्या मंदिराजवळ असलेल्या पिंपळाच्या झाडाला मोठी घंटा बांधली होती. बेडफोर्ड कंपनीची ३० आसन असलेली बस पहिल्या प्रवासासाठी सज्ज झाली. बसवर तिरंगा झेंडा फडकविण्यात आला होता. झाडावरची घंटा वाजली आणि स्वतंत्र भारताच्या पहिल्या राष्ट्रीयकृत प्रवासी वाहतूक सेवेला सुरुवात झाली. अहमदनगर ते पुणे पहिल्या बसचे प्रवास भाडे आठ आणे होते. अहमदनगर-पुणे मार्गावर धावलेल्या पहिल्या बसचे पहिले चालक श्री. किसनराव राउत तर पाहिले वाहक श्री. लक्ष्मण केवटे हे होते.

एकदम सुरुवातीला एसटीच्या ताफ्यात फोर्ट, शेवरलेट, बेडफोर्ड, सेडॉन, स्टुडबेकर, मॉरिस कमर्शियल, अल्बियन, लेलँड, कमर आणि फियाट अशा १० बसेस होत्या. १९५०च्या दशकाच्या सुरुवातीस, मॉरिस कमर्शियल चेसिससह दोन लक्झरी कोच दाखल झाल्या. त्यांना नीलकमल आणि गिर्यारोहिनी असे म्हणत. सन १९५० मध्ये केंद्राने रस्ता परिवहन महामंडळ कायदा पारित केला आणि महाराष्ट्रात बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन (बीएसआरटीसी) अस्तित्वात आले. राज्याची पुनर्रचना झाल्यानंतर याचे एमएसआरटीसी (MSRTC) मध्ये रुपांतर झाले. काळाच्या ओघात एसटी देखील बदलत गेली. ती खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची जीवनवाहिनी झाली.

RTE प्रवेश अर्ज भरण्यासाठी शेवटची संधी! पहा कधीपर्यंत…

RTE २५% जागांसाठी सुधारित शाळा व जागांची नवीन यादी संकेत्थळावर प्रसिद्ध झालेली असून २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील ९ हजार १३८ शाळांमध्ये १ लाख २ हजार ४३४ जागांवर नव्याने प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

1000628949

RTE प्रवेश अर्ज भरण्यासाठी मिळाली मुदतवाढ! पहा कधीपर्यंत…

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शालेय शिक्षण विभाग सुमारे दहा ते अकरा वर्षांपासून सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी RTE २५% आरक्षित जागांवर प्रवेश दिला जात आहे. परंतु राज्य शासनाने यावर्षी कायद्यात बदल करून केवळ सरकारी शाळांमध्ये RTE अंतर्गत प्राधान्याने प्रवेश देण्याचे धोरण निश्चित केले. सरकारी शाळा उपलब्ध नसतील तरच खाजगी स्वयंम अर्थसहाय्यीत शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल, अशी नियमावली तयार केली. यावर विविध पालक संघटनांनी आवाज उठवला. त्यात काही संघटनांनी न्यायालया पर्यंत देखील धाव घेतली. त्यावर न्यायालयाने शासनाच्या अधीसूचनेल सूचनेला स्थगिती दिली आहे. राज्य शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यातील RTE २५% आरक्षण जागांच्या प्रवेशा संदर्भात विनाअनुदानित शाळांना वगळण्याबाबत काढलेल्या अधीसूचनेला आवाहन देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली गेली होती. न्यायालयात याबाबत सुनावणी घेण्यात आली त्यात राज्य शासनाने ९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेला स्थगिती देण्यात आली. व नंतर राज्य शिक्षण विभागाने पहिल्या सारखीच प्रवेश प्रक्रिया परत एकदा नव्याने सुरू केली.

ही प्रवेश प्रकिया शुक्रवार दिनांक १७ मे २०२४ पासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली होती व दिनांक ३१/०५/२०२४ पर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार होते. परंतु आणखीन ही काही पालकांकडून प्रवेश अर्ज भरण्याचे काम बाकी आहे. काही तांत्रिक अडचणी मुळे ही अर्ज भरता आले नसून याचा पुरेपूर विचार करून राज्य शिक्षण विभागाने प्रवेश अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस वेळ वाढवून दिला आहे.
आता दिनांक ०४/०६/२०२४ पर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार आहेत. ही अंतिम मुदत वाढ असून यानंतर मुदत वाढ दिली जाणार नसून पालकांनी या मुदती पूर्वी आपले प्रवेश अर्ज भरण्याची विनंती केली आहे. तसेच स्थानिक स्तरावर व्यापक प्रमाणात याबाबत प्रसिद्धी देण्यात यावी असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.

RTE २५% जागांसाठी सुधारित शाळा व जागांची नवीन यादी संकेत्थळावर प्रसिद्ध झालेली असून २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील ९ हजार १३८ शाळांमध्ये १ लाख २ हजार ४३४ जागांवर नव्याने प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

click here
1693414770721

Maharashtra Weather पुढील काही तासात जोरदार पाऊस!

कोकण, मुंबईसह मध्यमहाराष्ट्र व मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता!

1000622652

Maharashtra Weather पुढील काही तासात जोरदार पाऊस!

पुढील काही दिवसांत उन्हाळा संपणार असून पावसाळा सुरू होणार आहे, सद्या सूर्य हा आग ओकत असून तापमानाचा पारा हा दिवसेंदिवस वाढतच चालला असून अधून मधून वातावरणात बदल झालेला पाहायला मिळत आहे अचानकच पाऊस पण हजेरी लावत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले पाहायला मिळत आहे. तर काही भागामध्ये शेतकरी हा पावसाची चातका सारखी वाट पाहत आहे.

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजनुसार राज्यामध्ये पुढील काही तासात काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई ठाणेसह कोकणात सद्या जरी उकाडा जाणवत असला तरी पुढील काही तासात पावसाची शक्यता आहे. तसेच मुंबई, ठाणे, रायगड, पालघर मध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळतील. मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील ४८ तासा मध्ये काही भागामध्ये तुरळक पाऊस तर काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी लागेल. तर काही भागामध्ये तुरळक होणाऱ्या पावसामुळे नागरिकांची उकड्या पासून काहीशी सुटका होणार आहे.

राज्यातील काही भागामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णचेच्या लाटेचा व दुष्काळग्रस्त परिस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा ही देण्यात आलेले आहे. अमरावती, अकोला, धुळे, जळगाव या जिल्ह्यातील नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे, या जिल्ह्यांना हवामान खात्याने उष्णतेचा येलो अलर्ट घोषित केला आहे. तर विदर्भातील अनेक जिल्ह्यात तापमान चाळीस पार केलेले पाहायला मिळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे मागील काही दिवसांत ४७ अंश सेल्सिअस तापमानची नोंद झाली आहे. हे राज्यातील सर्वाधिक तापमान म्हणून गणले गेले आहे. आणखीन काही जिल्ह्यांमध्ये ही चाळीस पार केलेले पाहायला मिळत आहे असे हवामान खात्याने माहिती दिली आहे.

click here
1693414770721

SSC Result Date दहावीच्या निकालाचा मुहूर्त ठरला!

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी निकालाची तारीख ठरली.

ssc

SSC Result Date दहावीच्या निकालाचा मुहूर्त ठरला!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मागील हप्त्यात म्हणजे २१ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर केला असून बारावीचा निकाल हा ९३.३७% इतका लागला असून नेहमी प्रमाणे मुलींनी आघाडी घेतली आहे.

मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षा मुंबई, पुणे, नागपुर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोल्हापूर, लातूर, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आल्या होत्या त्याचा निकाल २७ मे २०२४ रोजी प्रसिद्ध होणार असून तो निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे.

विद्यार्थांना त्यांचे गुण हे विषय निहाय पाहता येणार आहे. तसेच त्याची छापील प्रत ही विद्यार्थांना मिळू शकणार आहे. विद्यार्थ्याला जर स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादन केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत मूल्यांकन करायचे असेल तर संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करता येतो. ( http://verification.mh-ssc.ac.in/)

मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षा मुंबई, पुणे, नागपुर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोल्हापूर, लातूर, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आल्या होत्या त्याचा निकाल २७ मे २०२४ रोजी प्रसिद्ध होणार असून तो निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे.

विद्यार्थांना त्यांचे गुण हे विषय निहाय पाहता येणार आहे. तसेच त्याची छापील प्रत ही विद्यार्थांना मिळू शकणार आहे. विद्यार्थ्याला जर स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादन केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत मूल्यांकन करायचे असेल तर संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करता येतो. ( http://verification.mh-ssc.ac.in/)

दहावीचा निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळावर जावे…

click here

https://mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org/

https://sscresult.mahahsscboard.in/

https://results.digilocker.gov.in/

https://results.targetpublications.org/

Bombay High Court Bharti मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक व अनुवादक पदांची भरती

.

high court

.

सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली गेली आहे. या भरती अंतर्गत “कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी” या पदांची भरती केली जाणार आहे. बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत भरण्यात येणाऱ्या या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पुढे दिलेल्या लिंक वर अर्ज सबमिट करायचे आहेत.

जाहिरात क्र.: Adm./Advt./Jr.Trans./900/2024

पदाचे नाव – लिपिक

एकूण जागा – 56

 अर्ज सुरु झालेली तारीख१३ मे २०२ (११.०० AM)

अर्ज करणेची अंतिम तारीख२७ मे २०२४ (०५.०० PM)

शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही शाखेतील पदवी
  • टायपिंग कोर्स मधील बेसिक प्रमाणपत्र ( GCC-TBC) किवा ITI इंग्लिश टायपिंग मध्ये 40 श.प्र.मी
  • MS-CIT किवा समतुल्य कोर्स
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी.

वयाची अट – 09 मे 2024 रोजी 18 ते 38 वर्षे ( मागासवर्गीय 05 वर्षे सूट)कोर्ट च्या कर्मचाऱ्यांसाठी साठी वयाची अट नाही.

सर्वसाधारण फी  – 200 /-

नोकरी ठिकाण – नागपूर खंडपीठ

Bombay High Court अधिकृत वेबसाईट – पहा

Bombay High Court जाहिरात ( PDF) – पहा

ONLINE  अर्ज करा – Apply Online

अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती वाचा

  • आपण फॉर्म भरताना जो इमेल व मोबाईल नंबर देणार आहात तो नंबर चालू द्यावा.. जॉ आपण कायम वापर करणार आहात असा द्यावा. कारण सर्व माहिती आपणास याच नंबर व इमेल वरती येणार आहे.
  • विवाहित अर्जदाराने विवाहित असा उल्लेख करावा. व त्या संबंधित कागदपत्रे जोडावीत.
  • आपली शैक्षणिक माहिती भरत असताना सर्वप्रथम दहावी, बारावी, पदवी, अशा क्रमाने भरावी.
  • फॉर्म भरून झालेनंतर फी भरताना सर्वप्रथम सर्व फॉर्म तपासून पाहावा व मगच फी भरावी.
  • फोटो अपलोड करताना त्याची साईझ हि 40 kb इतकीच असावी. त्या फोटो मध्ये आपण चष्मा घातलेला नसावा.
  • खालील प्रमाणे परीक्षेचे स्वरूप व त्यास लागणारा अभ्यासक्रम व माहिती असेल. ती वाचून घ्यावी.
  • आणखीन सखोल माहितीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या व जाहिरात पहा.

.

.

कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी या पदांसाठी भरती

जाहिरात क्र. – No. Adm./Advt./Jr. Trans/900/2024

एकूण पदे – 07

शैक्षणिक पात्रता –

  • पदवीधर
  • टायपिंग कोर्स मधील बेसिक प्रमाणपत्र ( GCC-TBC) किवा ITI इंग्लिश टायपिंग मध्ये 40 श.प्र.मी
  • MS-CIT किवा समतुल्य कोर्स

वयाची अट – 10 मे २०२४ रोजी १८ ते ३८ वर्षे ( मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट)

सर्वसाधारण फी  – 200 /-

नोकरी ठिकाण – औरंगाबाद खंडपीठ

ऑनलाइन अर्ज करणेची शेवटची तारीख  २७ मे २०२४ पर्यंत

Bombay High Court अधिकृत वेबसाईट – पहा

BombaBombay High Court जाहिरात ( PDF)  पहा

Online अर्ज करणेसाठी – Click Here

आणखीन सखोल माहितीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या व जाहिरात पहा.

अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती वाचा

  • आपण फॉर्म भरताना जो इमेल व मोबाईल नंबर देणार आहात तो नंबर चालू द्यावा.. जॉ आपण कायम वापर करणार आहात असा द्यावा. कारण सर्व माहिती आपणास याच नंबर व इमेल वरती येणार आहे.
  • विवाहित अर्जदाराने विवाहित असा उल्लेख करावा. व त्या संबंधित कागदपत्रे जोडावीत.
  • आपली शैक्षणिक माहिती भरत असताना सर्वप्रथम दहावी, बारावी, पदवी, अशा क्रमाने भरावी.
  • फॉर्म भरून झालेनंतर फी भरताना सर्वप्रथम सर्व फॉर्म तपासून पाहावा व मगच फी भरावी.
  • फोटो अपलोड करताना त्याची साईझ हि 40 kb इतकीच असावी. त्या फोटो मध्ये आपण चष्मा घातलेला नसावा.
  • खालील प्रमाणे परीक्षेचे स्वरूप व त्यास लागणारा अभ्यासक्रम व माहिती असेल. ती वाचून घ्यावी.
  • आणखीन सखोल माहितीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या व जाहिरात पहा.

अशीच आणखीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन व्हा.

click here
1693414770721

आज बारावीचा निकाल मार्क पाहण्यासाठीया लिंक वर जा

अखेर प्रतीक्षा संपली आज बारावीचा निकाल जाहीर होणार

1000605256 1

.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा कडून घेण्यात आलेल्या यंदाच्या बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाला आज मुहूर्त लागले.

यंदा बारावीचा निकाल किती टक्के लागणार याबाबतीत विद्यार्थी व पालक यामध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यावर्षी निकालामध्ये मुलं की मुली कोण अव्वल राहणार आहे हे आज पाहायला मिळेल.

राज्यातील एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थिनी बारावी बोर्डाची परीक्षा दिली होती. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावी बोर्डाची परीक्षा घेण्यात आली होती.

ऑनलाइन बारावीचा निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ

click here

https://mahresult.nic.in/

https://results.gov.in/

https://results.nic.in/

.

बारावीचा ऑनलाइन निकाल कसा पाहावा

1. निकाल पाहण्यासाठी प्रथमतः https://mahresult.nic.in/ या संकेतस्थळावर जावे.

2. HSC निकालावर क्लिक करावे.

3. आपले सीट नंबर टाकावा.

4. नंतर तुमच्या आईच्या नावाचे सुरुवातीचे तीन अक्षर टाका. ( उदा. आईचे नाव Radha असेल तर RAD असे टाका.)

5. सबमिट बटणावर क्लिक करा लगेच तुमचा निकाल समोर दिसेल.

6. आपण निकालाची प्रिंट घेऊ शकता किंवा सेव करून ठेवू शकता

.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा कडून घेण्यात आलेल्या यंदाच्या बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाला आज मुहूर्त लागले.

यंदा बारावीचा निकाल किती टक्के लागणार याबाबतीत विद्यार्थी व पालक यामध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यावर्षी निकालामध्ये मुलं की मुली कोण अव्वल राहणार आहे हे आज पाहायला मिळेल.

राज्यातील एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थिनी बारावी बोर्डाची परीक्षा दिली होती. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावी बोर्डाची परीक्षा घेण्यात आली होती.