Rain पंजाबराव डक यांचा अंदाज! पुढील तिन दिवसात काही भागामध्ये होणार मुसळधार पाऊस?

1000552494 2

Rain पंजाबराव डक यांचा अंदाज! पुढील तिन दिवसात काही भागामध्ये होणार मुसळधार पाऊस?

सध्या उन्हाचा तडाखा जाणवत असताना अधून मधून वातावरणात बदल होत असून अचानक काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडतो आहे.

हवामान अंदाजक पंजाबराव डक यांनी हवामाना बद्दल महत्वाची माहिती दिली आहे.
हवामान अंदाजक पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये २० एप्रिल पर्यंत अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

या भागामध्ये होणार अवकाळी पाऊस

गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या हवामानामध्ये अचानक बदल होताना दिसत आहे. या अचानक होणाऱ्या बदलामुळे शेतकऱ्याचे नुकसान होताना पाहायला मिळते आहे.
हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी अशातच एक मोठं विधान केले आहे की २० तारखे पर्यंत अवकाळी पावसाचा जोर कायम राहणार आहे. तरी शेतकऱ्यांनी व नागरिकांनी योग्य ति खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे.

मध्य महाराष्ट्र, कोकण व मराठवाडा येथे २० तारखेपर्यंत दाट शक्यता वर्तवली आहे. तसेच पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मराठवाडा विभागात देखील पोषक वातावरण तयार झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच दुसरीकडे पश्चिममहाराष्ट्रातील पुणे सातारा या भागात देखील पावसाची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

याच दरम्यान बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जळगाव, नाशिक, जालना, मुंबई, हिंगोली, या भागामध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे सदर भागातील शेतकऱ्यांना सावध राहण्याचे पंजाबराव डक यांनी केले आहे. तसेच राज्यातील काही भागांमध्ये दिवसा तापमान देखील पूर्वीपेक्षा जास्त वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे. नागरिकांनी उन्हामध्ये घराबाहेर पडू नये असे प्रशासनाच्या वतीने आव्हान करण्यात आलेले आहे.

1693414770721

Water Storage पहा आपल्या जिल्ह्याचा पाणीसाठा किती टक्के शिल्लक आहे?

1000542066

.

Water Storage पहा आपल्या जिल्ह्याचा पाणीसाठा किती टक्के शिल्लक आहे?

.

चैत्र महिना म्हणजे तीव्र उन्हाळ्याची सुरुवात. उन्हाळा सुरू होताच जमिनीमधील पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.उन्हाळा म्हटलं की सर्वच ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असते शेतीला पाणी, जनावरांसाठी लागणारे पाणी, रोजच्या वापरातील लागणारे पाणी, पिण्याचे पाणी यासाठी तर ग्रामीण भागामध्ये खूप दूरवर जाऊन पिण्यासाठी पाणी आणावे लागते. केंद्रीय भूजल मंडळाने महाराष्ट्रातील भूजलसाठ्याची आकडेवारी वार्षिक अहवालात जाहीर केली आहे. २०२३ मध्ये महाराष्ट्रात पडलेला पाऊस, त्यातून जमिनीत जिरलेला पाऊस, त्यातून वर्षभरात झालेला पाण्याचा उपसा आणि आता भविष्यकाळासाठी वापरण्यायोग्य उरलेला जलसाठा अहवालात नमूद केला आहे.

चैत्र महिना म्हणजे तीव्र उन्हाळ्याची सुरुवात. उन्हाळा सुरू होताच जमिनीमधील पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.
उन्हाळा म्हटलं की सर्वच ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असते शेतीला पाणी, जनावरांसाठी लागणारे पाणी, रोजच्या वापरातील लागणारे पाणी, पिण्याचे पाणी यासाठी तर ग्रामीण भागामध्ये खूप दूरवर जाऊन पिण्यासाठी पाणी आणावे लागते.

केंद्रीय भूजल मंडळाने महाराष्ट्रातील भूजलसाठ्याची आकडेवारी वार्षिक अहवालात जाहीर केली आहे. २०२३ मध्ये महाराष्ट्रात पडलेला पाऊस, त्यातून जमिनीत जिरलेला पाऊस, त्यातून वर्षभरात झालेला पाण्याचा उपसा आणि आता भविष्यकाळासाठी वापरण्यायोग्य उरलेला जलसाठा अहवालात नमूद केला आहे.

.

गेल्या वर्षीचा पाऊस अन सद्याची भूजल साठ्याची स्थिती

32 अब्ज क्यूबिक मीटर जल पुनर्भरण झाले, तर 16 अब्ज क्यूबिक मीटर पाण्याचा उपसा झाला. सद्या 14 अब्ज क्यूबिक मीटर पाणी जमिनीत शिल्लक आहे. तर 2 अब्ज क्यूबिक मीटर पाण्याची वाफ झाल्याचे अहवालातून दिसून आले.

.

.

कोणत्या जिल्ह्यात किती टक्के पाणी साठा आहे?

अमरावती जिल्हा ९१.८३ उपसा, तर ८.१७% शिल्लक साठा,
अहमदनगर जिल्हा ७९.२० उपसा, २०.८०% शिल्लक साठा,
जळगाव जिल्हा ७८.७६ उपसा, २१.२४% शिल्लक साठा,
सोलापूर जिल्हा ७७.५४ उपसा, २२.४६% शिल्लक साठा,
बुलढाणा जिल्हा ७६.९५ उपसा, २३.०५% शिल्लक साठा,
छ. संभाजीनगर जिल्हा ७१.६४ उपसा, २८.३६% शिल्लक साठा,
पुणे जिल्हा ६९.६५ उपसा, ३०.३५% साठा,
अकोला जिल्हा ६५.५९ उपसा, ३४.४१% शिल्लक साठा,
सातारा जिल्हा ३७.८९ उपसा, ६२.११% साठा,
धाराशिव जिल्हा ६२.०१ उपसा, ३७.९९% शिल्लक साठा,
वाशिम जिल्हा उपसा ६०.२०, शिल्लक साठा ३९.८० %,
बिड जिल्हा ५९.२२ उपसा, शिल्लक साठा ४०.७८ %,
नाशिक जिल्हा उपसा ५८.४१ तर शिल्लक साठा ४१.५९ %,
लातूर जिल्हा ५४.८८ उपसा तर शिल्लक साठा ४५.१२ %,
जालना जिल्हा ५४.८५% उपसा तर शिल्लक साठा ४५.१५%,
सांगली जिल्हा ५४.१९ टक्के उपसा तर शिल्लक साठा ४५.८१%,
वर्धा जिल्हा ५३.५५ उपसा तर शिल्लक साठा ४६.४५%,
धुळे जिल्हा ५१.७७ उपसा तर शिल्लक साठा ४८.२३%

ww 4