EWS, SEBC, OBC विद्यार्थिनींसाठी मोठी घोषणा?

Maharastra Government News Education News महाराष्ट्र राज्य सरकारने EWS, SBEC, OBC, विद्यार्थिनी साठी मोठी घोषणा केली आहे? मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय?

1000722884

EWS, SEBC, OBC विद्यार्थिनींसाठी मोठी घोषणा?

जसं जशी विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे तसं राज्यसरकार वेगवेगळ्या योजनाची घोषणा करताना पाहायला मिळत आहे आत्ताच मागील काही दिवसापूर्वी राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजनेची घोषणा केली आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने मंत्री मंडळाच्या बैठकीत विद्यार्थिनी साठी मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
EWS, SBEC, OBC विद्यार्थिनी साठी फीसमध्ये ५०% सवलत राज्य सरकार देत होते परंतु आता ही सवलत १००% देण्याबाबत काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे आढळून आले आहे व लवकरच त्याबाबतीत अधिकृत घोषणा केली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग, आणि इतर मागास प्रवर्गातील व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या र्विद्यार्थिनींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कात ५०% सूट दिली जात होती परंतु आता या शुल्कात वाढ करून ती १००% सूट दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थिनींना मोठा दिलासा मिळणार आहे.

click here
1693414770721

Free Tab दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यास मिळणार मोफत TAB व रोज 6 GB डाटा! पहा काय आहे योजना?

Tab

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यास मिळणार मोफत TAB व रोज 6 GB डाटा ! पहा काय आहे योजना?

नमस्कार विद्यार्थी मित्रानो, महाराष्ट्र राज्य शासनाच्या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्या मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना “मोफत टॅबलेट योजना” Free Tablet Yojana Maharashtra सुरू केली गेलीआहे. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, पात्रता काय आहे तसेच कागदपत्रे कोणती लागणार आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. शासन महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी बऱ्याच ठिकाणी मोफत प्रशिक्षणाची सोय करत आहे. त्यांना विविध सवलती वेगवेगळ्या योजने मार्फत दिल्या जातात. शासनाने या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक संस्थेची निर्मिती केली आहे. यामध्ये बार्टी, सारथी तसेच महाज्योती या आहेत. आज आपण महाज्योतीमार्फत दहावी पास विद्यार्थ्यांना Free Tablet Yojana मोफत टॅबलेट योजना आहे याबद्दल माहिती पाहणार आहोत.

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारकार्याचा वसा चालविण्यासाठी, त्यांच्या विचारातला सुशिक्षित समाज निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकासासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (महाज्योती) स्थापना शासन निर्णय दि.०८.०८.२०१९ ला केली आहे. तेव्हापासून आज पर्यंत शासन या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे.

महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना JEE / NEET / MHT- CET Batch 2026 करीता परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येत आहे. त्याकरीता इच्छूक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB / Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्र व पात्रता आणि अर्ज कसा करावा ही संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्याची पात्रता

  • विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा / असावी.
  • विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा / असावी तसेच विद्यार्थी नॉन- क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/ असावी.
  • सन 2024 मध्ये 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरीता पात्र राहतील.
  • विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. या बाबतची कागदपत्रे स्पष्ट व दुष्यपद्धतीने जोडणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणा नुसार करण्यात येईल.
  • इयत्ता 10 वी मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यां करीता 70% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यां करीता 60% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा नाही कसे हे विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड वरील नमुद पत्त्यावरुन ठरविले जाईल.

अर्ज करण्याकरीता आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड (पुढील व मागील बाजु सहित)
  • रहिवासी दाखला (Domicile Certificate)
  • जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • वैध नॉन- क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)
  • 10 वी ची गुण पत्रिका.
  • विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट)
  • दिव्यांग असल्यास दाखला.
  • अनाथ असल्यास दाखला.

सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे

सामाजिक प्रवर्गटक्केवारी
इतर मागास वर्ग (OBC)59 %
निरधीसुचती जमाती अ (VJ-A )10%
भटक्या जमाती ब ( NT-B)8%
भटक्या जमाती क (NT-C)11%
भटक्या जमाती ड (NT-D)6%
विशेष मागास प्रवर्ग (SBC)6%
एकूण100%

टीप – शहरी तसेच ग्रामीण भागाकरीता विद्यार्थ्यांची निवड संख्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठरविण्यात येईल.

समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे

1) प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे.

2) दिव्यांगाकरीता 4% जागा आरक्षित आहे.

3) अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.

अर्ज कसा करावा

  1. महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील”Application for JEE / NEET / MHT-CET Batch – 2026 Training” यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.

2. अर्जासोबत ‘ब’ मध्ये नमुद सर्व कागदपत्रे स्वाक्षांकीत करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन जोडावे.

अटी व शर्ती

  1. अर्ज करण्याची अंतिम दि. 10/07/2024 आहे.
  2. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  3. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे तसेच निवडीची पद्धती बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.
  4. कोणत्याही माध्यमातुन व अंतीम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारीअसल्यास विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल.
  5. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संर्पक करावा संपर्क क्र 0712-2870120/21

E-mail Id : mahajyotimpsc21@gmail.com

click here
1693414770721

RTE प्रवेश लांबणीवर? पहा काय कारण!

.

1000672698

.

राज्यातील लाखो पालक RTE २५% राखीव जागेसाठी होणाऱ्या प्रवेशासाठी प्रतीक्षेत आहेत राज्य शिक्षण विभागाने RTE कायद्यात केलेल्या बदलामुळे काही सामाजिक संघटना व पालक यांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते व न्यायालयाने या बदलावर स्थगिती दिली होती. त्या नंतर शिक्षण विभागाने पुन्हा नव्याने ही प्रवेश प्रक्रिया सुरू केली होती व याचा लकी ड्रॉ (सोडत) दिनांक ७ जून २०२४ रोजी झाली होती परंतु या सोडतीचा निकाल हा दिनांक १२ जून रोजी न्यायालयीन निकाला नंतर जाहीर होणार होता परंतु काही कारणास्तव ही न्यायालयीन सुनावणी पुढे ढकलली होती.

ही सुनावणी दिनांक १८ जून रोजी होत असताना या सुनावणी दरम्यान आणखी काही संघटनांनी व शाळांनी RTE प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत त्यामुळे RTE प्रकरणाची पुढील सुनावणी ही येत्या ४ जुलै २०२४ रोजी घेतली जाणार आहे. परिणामी पालकांना प्रवेशासाठी जुलै ची वाट पहावी लागणार आहे असे एका याचिकाकर्त्याच्या वकिलाने सांगितले आहे. मात्र पुढील सुनावणी ही ११ जुलै रोजी घेतली जाणार असल्याची माहिती याचिकाकर्ते शरद जावडेकर यांनी दिली आहे.

राज्य शालेय शिक्षण विभागाने RTE कायद्यात केलेला बदल हा योग्य आहे. त्यामुळे त्याला देण्यात आलेली स्थगिती उठवावी, अशी एक याचिका न्यायालयात सादर करण्यात आली आहे. तर काही शाळांनी कायद्यात बदल केल्यानुसार RTE च्या आरक्षित जागांवर प्रवेश देखील दिले आहेत. या जागांना संरक्षण द्यावे, अशीही याचिका दाखल झालेली आहे. या दोन्ही याचिकांची स्वतंत्र सुनावणी घ्यावी लागणार आहे. तसेच सध्या थांबलेल्या आरटीई प्रवेशाबाबत न्यायालयाने कोणाताही निर्णय दिलेला नाही.

हस्तक्षेप याचिका न्यायालयाने दाखल करून घेतल्या आहेत व हस्तक्षेप करणाऱ्या तीनही संस्थाना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी दहा दिवसाची मुदत न्यायालयाने दिली आहे. या संस्थांच्या प्रतिपादनावर जनहित याचिका कर्त्याना व शासनाला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी नंतरचे दहा दिवस देण्यात आले आहेत व याची अंतिम सुनावणी ११ जुलै २०२४ होणार आहे.
पण याचा परिणाम हा RTE २५% राखीव जागेसाठी होणारे प्रवेश लांबणीवर पडणार आहेत आणि पालकांचा तणाव आणखीनच वाढणार आहे.

click here
1693414770721

MSRTC विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी एसटी पास आता शाळेत मिळणार!

आत्ता विद्यार्थांना एसटी पास साठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही. पास आता मिळणार थेट शाळा महाविद्यालयात.!

Pass

.

सन २०२४- २५ शैक्षणिक वर्षाची शाळा दिनांक १५ जून २०२४ रोजी सुरू झाली आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची योजना आणली एसटी चे पास हे आता थेट शाळा महाविद्यालयात मिळणार आहेत. या नवीन योजने मुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शाळा आणि महाविद्यालयीन लाखो विद्यार्थी यांना फायदा होईल.

“एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही विशेष मोहीम सर्व महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) वतीने राबविण्यात येणार आहे असे मंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी माहिती दिली आहे. ही योजना राबविण्याबाबत सूचना त्यांनी महाराष्ट्रातील सर्व स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहे.

यापूर्वी विद्यार्थी विद्यार्थिनींना बसस्थानकावर जाऊन रांगेत उभे राहून पास घ्यावे लागत असत पण आता यापुढे पास घेण्यासाठी बसस्थानकावर जाण्याची किंवा रांग लावण्याची गरज नाही. शाळा किंवा महाविद्यालयाने दिलेल्या यादी नुसार एसटी कर्मचारी यांच्या मार्फत त्या विद्यार्थी विद्यार्थिनींना थेट शाळे मध्ये येऊन पास वितरित केले जाणार आहेत जेणे करून विद्यार्थांचा वेळ ही वाया जाणार नाही. ही योजना दिनांक १८ जून पासून एसटी प्रशासना मार्फत राबविण्यात येणार आहे. त्यापूर्वी सर्व शाळा महाविद्यालय यांना एसटी च्या आगार प्रमुख यांनी पत्र देऊन आपल्या शाळा महाविद्यालयातील पास धारक विद्यार्थी विद्यार्थिनींची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे. या अभिनव उपक्रमाचा फायदा राज्यातील लाखो विद्यार्थीना होणार आहे.

या वर्षातील पहिल्या सत्रातील शाळा सुरू झाल्या असून घरापासून शाळेपर्यंत व शाळेपासून घरापर्यंत ये जा करण्यासाठी विद्यार्थांना व विद्यार्थीनीना महामंडळाच्या एसटी च्या माध्यमातून महाराष्ट्रभर विविध योजना राबविल्या जातात विद्यार्थांना एसटी च्या पास साठी महामंडळ ६६% इतकी सवलत देत आहे तर ३३% प्रवास भाडे भरून मासिक पास देत आहे व विद्यार्थिनी साठी महामंडळ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजने अंतर्गत बारावी पर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थिनींना मोफत पास देत आहे.

click here
1693414770721

RTE प्रवेश पडले लांबणीवर, पहा का होतय उशीर!

.

1000657475

.

शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव 25% जागा भरणे हे लांबणीवर पडले आहे. कारण ही प्रक्रिया सध्या न्यायप्रविष्ठ असल्यामुळे न्यायालयामध्ये 12 जून रोजी सुनावणी होणार होती परंतु काही कारणास्तव ही सुनावणी पुढे ढकलली की 13 जून रोजी होईल असेल वाटले होते परंतु 13 जून रोजी ही सुनावणी झाली नसून ही सुनावणी आता दिनांक 18 जून रोजी होणार असून तोपर्यंत पालकांना प्रवेशासाठी वाट पहावी लागणार आहे.

सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी RTE २५% प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (लॉटरी) शुक्रवार दिनांक. ০७/০६/२০२४ रोजी झाली असून लकी ड्रॉ चा निकाल हा 18 जून नंतरच जाहीर होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.

RTE प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश अर्ज स्वीकारण्यात आलेले आहेत. राज्यातील ९ हजार २१७ शाळांत १ लाख ५ हजार ३९९ जागांवरील प्रवेशासाठी २ लाख ४२ हजार ९७२ अर्ज आलेले आहेत. आणि शिक्षण विभागा मार्फत प्रवेशासाठी ऑनलाईन लॉटरी काढलेली असली तरी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थांच्या पालकांना प्रवेशासाठी आणखीन काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण काही शाळा न्यायालयात गेल्या आहेत. या शाळांनी RTE २५% राखीव जागांवर इतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेले आहेत. त्यामुळे शाळांच्या प्रवेशाचे काय करायाचे? असा प्रश्न समोर आला आहे. त्यामुळे आता न्यायालयीन निकालानंतर हा प्रश्न सुटेल.

click here
1693414770721

RTE २५% प्रवेशाची सोडत (लॉटरी) आज !

.

1000641519

.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शालेय शिक्षण विभाग सुमारे दहा ते अकरा वर्षांपासून सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी RTE २५% आरक्षित जागांवर प्रवेश दिला जात आहे. परंतु राज्य शासनाने यावर्षी कायद्यात बदल करून केवळ सरकारी शाळांमध्ये RTE अंतर्गत प्राधान्याने प्रवेश देण्याचे धोरण निश्चित केले. सरकारी शाळा उपलब्ध नसतील तरच खाजगी स्वयंम अर्थसहाय्यीत शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल, अशी नियमावली तयार केली. यावर विविध पालक संघटनांनी आवाज उठवला. त्यात काही संघटनांनी न्यायालया पर्यंत देखील धाव घेतली. त्यावर न्यायालयाने शासनाच्या अधीसूचनेल सूचनेला स्थगिती दिली आहे. राज्य शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यातील RTE २५% आरक्षण जागांच्या प्रवेशा संदर्भात विनाअनुदानित शाळांना वगळण्याबाबत काढलेल्या अधीसूचनेला आवाहन देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली गेली होती. न्यायालयात याबाबत सुनावणी घेण्यात आली त्यात राज्य शासनाने ९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेला स्थगिती देण्यात आली. व नंतर राज्य शिक्षण विभागाने पहिल्या सारखीच प्रवेश प्रक्रिया परत एकदा नव्याने सुरू केली.

ही प्रवेश प्रकिया पुन्हा नव्याने शुक्रवार दिनांक १७ मे २०२४ पासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली होती व दिनांक ३१/०५/२०२४ पर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार होते. परंतु राज्य शिक्षण विभागाने प्रवेश अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस वेळ वाढवून दिला होता.  दिनांक ०४/०६/२०२४ पर्यंत प्रवेश अर्ज भरण्यास मुदत वाढ मिळाली होती.

सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी RTE २५% प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (लॉटरी) शुक्रवार दिनांक. ০७/০६/२০२४ रोजी सकाळी ११.०० वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे येथे काढण्यात येणार आहे. सदर सोडतचे थेट प्रक्षेपण व्ही.सी द्वारे करण्यात येणार आहे. आपणास ऑनलाईन या कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरिता https://youtube.com/live/bNgUW9iKSXO?feature=share लिक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी सर्व पालक या लिंक वर जाऊन ऑनलाइन सदर सोडतचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.

सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी RTE २५% प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (लॉटरी) शुक्रवार दिनांक. ০७/০६/२০२४ रोजी सकाळी ११.०० वाजता महाराष्ट्रराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे येथे काढण्यात येणार आहे. सदर सोडतचे थेट प्रक्षेपण व्ही.सी द्वारे करण्यात येणार आहे. आपणास ऑनलाईन या कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरिता https://youtube.com/live/bNgUW9iKSXO?feature=share लिक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी सर्व पालक या लिंक वर जाऊन ऑनलाइन सदर सोडतचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांची लॉटरी 7 जूनला काढण्यात येणार आहे. मात्र या लॉटरीचा निकाल तातडीने जाहीर न करता न्यायालयाच्या निर्देशानुसार 13 जूनला जाहीर केला जाईल, अशी माहिती राज्य सरकारने बुधवारी दिली आहे.

ऑनलाइन सोडतचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी खालील लिंक वर जा.

click here

RTE प्रवेश अर्ज भरण्यासाठी शेवटची संधी! पहा कधीपर्यंत…

RTE २५% जागांसाठी सुधारित शाळा व जागांची नवीन यादी संकेत्थळावर प्रसिद्ध झालेली असून २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील ९ हजार १३८ शाळांमध्ये १ लाख २ हजार ४३४ जागांवर नव्याने प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

1000628949

RTE प्रवेश अर्ज भरण्यासाठी मिळाली मुदतवाढ! पहा कधीपर्यंत…

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शालेय शिक्षण विभाग सुमारे दहा ते अकरा वर्षांपासून सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी RTE २५% आरक्षित जागांवर प्रवेश दिला जात आहे. परंतु राज्य शासनाने यावर्षी कायद्यात बदल करून केवळ सरकारी शाळांमध्ये RTE अंतर्गत प्राधान्याने प्रवेश देण्याचे धोरण निश्चित केले. सरकारी शाळा उपलब्ध नसतील तरच खाजगी स्वयंम अर्थसहाय्यीत शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल, अशी नियमावली तयार केली. यावर विविध पालक संघटनांनी आवाज उठवला. त्यात काही संघटनांनी न्यायालया पर्यंत देखील धाव घेतली. त्यावर न्यायालयाने शासनाच्या अधीसूचनेल सूचनेला स्थगिती दिली आहे. राज्य शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यातील RTE २५% आरक्षण जागांच्या प्रवेशा संदर्भात विनाअनुदानित शाळांना वगळण्याबाबत काढलेल्या अधीसूचनेला आवाहन देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली गेली होती. न्यायालयात याबाबत सुनावणी घेण्यात आली त्यात राज्य शासनाने ९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेला स्थगिती देण्यात आली. व नंतर राज्य शिक्षण विभागाने पहिल्या सारखीच प्रवेश प्रक्रिया परत एकदा नव्याने सुरू केली.

ही प्रवेश प्रकिया शुक्रवार दिनांक १७ मे २०२४ पासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली होती व दिनांक ३१/०५/२०२४ पर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार होते. परंतु आणखीन ही काही पालकांकडून प्रवेश अर्ज भरण्याचे काम बाकी आहे. काही तांत्रिक अडचणी मुळे ही अर्ज भरता आले नसून याचा पुरेपूर विचार करून राज्य शिक्षण विभागाने प्रवेश अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस वेळ वाढवून दिला आहे.
आता दिनांक ०४/०६/२०२४ पर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार आहेत. ही अंतिम मुदत वाढ असून यानंतर मुदत वाढ दिली जाणार नसून पालकांनी या मुदती पूर्वी आपले प्रवेश अर्ज भरण्याची विनंती केली आहे. तसेच स्थानिक स्तरावर व्यापक प्रमाणात याबाबत प्रसिद्धी देण्यात यावी असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.

RTE २५% जागांसाठी सुधारित शाळा व जागांची नवीन यादी संकेत्थळावर प्रसिद्ध झालेली असून २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील ९ हजार १३८ शाळांमध्ये १ लाख २ हजार ४३४ जागांवर नव्याने प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

click here
1693414770721

SSC Result Date दहावीच्या निकालाचा मुहूर्त ठरला!

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी निकालाची तारीख ठरली.

ssc

SSC Result Date दहावीच्या निकालाचा मुहूर्त ठरला!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मागील हप्त्यात म्हणजे २१ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर केला असून बारावीचा निकाल हा ९३.३७% इतका लागला असून नेहमी प्रमाणे मुलींनी आघाडी घेतली आहे.

मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षा मुंबई, पुणे, नागपुर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोल्हापूर, लातूर, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आल्या होत्या त्याचा निकाल २७ मे २०२४ रोजी प्रसिद्ध होणार असून तो निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे.

विद्यार्थांना त्यांचे गुण हे विषय निहाय पाहता येणार आहे. तसेच त्याची छापील प्रत ही विद्यार्थांना मिळू शकणार आहे. विद्यार्थ्याला जर स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादन केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत मूल्यांकन करायचे असेल तर संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करता येतो. ( http://verification.mh-ssc.ac.in/)

मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षा मुंबई, पुणे, नागपुर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोल्हापूर, लातूर, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आल्या होत्या त्याचा निकाल २७ मे २०२४ रोजी प्रसिद्ध होणार असून तो निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे.

विद्यार्थांना त्यांचे गुण हे विषय निहाय पाहता येणार आहे. तसेच त्याची छापील प्रत ही विद्यार्थांना मिळू शकणार आहे. विद्यार्थ्याला जर स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादन केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत मूल्यांकन करायचे असेल तर संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करता येतो. ( http://verification.mh-ssc.ac.in/)

दहावीचा निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळावर जावे…

click here

https://mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org/

https://sscresult.mahahsscboard.in/

https://results.digilocker.gov.in/

https://results.targetpublications.org/

आज बारावीचा निकाल मार्क पाहण्यासाठीया लिंक वर जा

अखेर प्रतीक्षा संपली आज बारावीचा निकाल जाहीर होणार

1000605256 1

.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा कडून घेण्यात आलेल्या यंदाच्या बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाला आज मुहूर्त लागले.

यंदा बारावीचा निकाल किती टक्के लागणार याबाबतीत विद्यार्थी व पालक यामध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यावर्षी निकालामध्ये मुलं की मुली कोण अव्वल राहणार आहे हे आज पाहायला मिळेल.

राज्यातील एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थिनी बारावी बोर्डाची परीक्षा दिली होती. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावी बोर्डाची परीक्षा घेण्यात आली होती.

ऑनलाइन बारावीचा निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ

click here

https://mahresult.nic.in/

https://results.gov.in/

https://results.nic.in/

.

बारावीचा ऑनलाइन निकाल कसा पाहावा

1. निकाल पाहण्यासाठी प्रथमतः https://mahresult.nic.in/ या संकेतस्थळावर जावे.

2. HSC निकालावर क्लिक करावे.

3. आपले सीट नंबर टाकावा.

4. नंतर तुमच्या आईच्या नावाचे सुरुवातीचे तीन अक्षर टाका. ( उदा. आईचे नाव Radha असेल तर RAD असे टाका.)

5. सबमिट बटणावर क्लिक करा लगेच तुमचा निकाल समोर दिसेल.

6. आपण निकालाची प्रिंट घेऊ शकता किंवा सेव करून ठेवू शकता

.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा कडून घेण्यात आलेल्या यंदाच्या बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाला आज मुहूर्त लागले.

यंदा बारावीचा निकाल किती टक्के लागणार याबाबतीत विद्यार्थी व पालक यामध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यावर्षी निकालामध्ये मुलं की मुली कोण अव्वल राहणार आहे हे आज पाहायला मिळेल.

राज्यातील एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थिनी बारावी बोर्डाची परीक्षा दिली होती. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावी बोर्डाची परीक्षा घेण्यात आली होती.

HSC RESULT बारावीचा निकाल होणार उद्या जाहीर

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा कडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली.

1000604080

HSC RESULT बारावीचा निकाल होणार उद्या जाहीर

बारावीच्या बोर्डाची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थांना निकालाची आतुरता लागलेली असुन सोशल मीडियावर निकालाच्या तारखे बाबतीत खूपच अफवंचा सुळसुळाट झालेला आहे. परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांची निकाल बाबतची प्रतीक्षा संपली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारीत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकला बाबत तारीख ठरली आहे. उद्या मंगळवार दिनांक २१ मे २०२४ रोजी दुपारी एक वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणार आहे अशी माहिती मंडळाने दिली आहे.

यंदा बारावीचा निकाल किती टक्के लागणार याबाबतीत विद्यार्थी व पालक यामध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यावर्षी निकालामध्ये मुलं की मुली कोण अव्वल राहणार आहे हे उद्या पाहायला मिळेल.

राज्यातील एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थिनी बारावी बोर्डाची परीक्षा दिली होती. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावी बोर्डाची परीक्षा घेण्यात आली होती.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारीत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकला बाबत तारीख ठरली आहे. उद्या मंगळवार दिनांक २१ मे २०२४ रोजी दुपारी एक वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणार आहे अशी माहिती मंडळाने दिली आहे.

राज्यातील एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थिनी बारावी बोर्डाची परीक्षा दिली होती. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावी बोर्डाची परीक्षा घेण्यात आली होती.

ऑनलाइन बारावीचा निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ

click here

https://mahresult.nic.in/

https://mahahsscboard.maharashtra.gov.in

https://results.gov.in

https://results.nic.in

https://mahahsc.in

.

बारावीचा ऑनलाइन निकाल कसा पाहावा

1. निकाल पाहण्यासाठी प्रथमतः https://mahresult.nic.in/ या संकेतस्थळावर जावे.

2. HSC निकालावर क्लिक करावे.

3. आपले सीट नंबर टाकावा.

4. नंतर तुमच्या आईच्या नावाचे सुरुवातीचे तीन अक्षर टाका. ( उदा. आईचे नाव Radha असेल तर RAD असे टाका.)

5. सबमिट बटणावर क्लिक करा लगेच तुमचा निकाल समोर दिसेल.

6. आपण निकालाची प्रिंट घेऊ शकता किंवा सेव करून ठेवू शकता

.