महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यामधील केशरी रेशनकार्ड धारकांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मागील वर्षी अत्यंत महत्वाची योजना अमलात आणली असून या योजनेत केशरी रेशनकार्ड धारकांना रेशन वरील धान्य ऐवजी रोख रक्कम DBT बँक खात्यात जमा होत असून ही रक्कम दरमाह प्रती लाभार्थी १५०/- रुपये मिळत आहे. ती आत्ता वाढून मिळणार आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त संभाजीनगर, बीड, जालना, नांदेड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला आणि वर्धा हे चौदा जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना रेशन वरील धान्य ऐवजी रोख रक्कम मिळणार असा जी आर २८ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रसिद्ध झाला होता यामध्ये दरमाह प्रतीव्यक्ती मिळणारी रोख रक्कम ही ₹ १५०/- होती.
परंतु आज दिनांक २० जून २०२४ रोजी निघालेला जी आर (अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन परिपत्रक क्रमांकः अधापु-२०२४/ प्र . क्र. ४६ /नापु- २२ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.) हा दरमाह प्रातिव्यक्ती रू १५०/- वरून वाढवून ही रक्कम आता दरमहा प्रतिव्यक्ती रू १७०/- इतकी करण्यात आली आहे. व ही रक्कम केशरी शिधापत्रिका धारकाच्या बँक खात्यात (DBT) थेट जमा होणार आहे.
आपल्या शिधापत्रिकेत जर पाच नाव असतील तर १७०×५=८५०/- रुपये महिन्याला आपल्या कुटुंब प्रमुखाच्या खात्यावर थेट जमा होणार आहेत.
राज्यातील लाखो पालक RTE २५% राखीव जागेसाठी होणाऱ्या प्रवेशासाठी प्रतीक्षेत आहेत राज्य शिक्षण विभागाने RTE कायद्यात केलेल्या बदलामुळे काही सामाजिक संघटना व पालक यांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते व न्यायालयाने या बदलावर स्थगिती दिली होती. त्या नंतर शिक्षण विभागाने पुन्हा नव्याने ही प्रवेश प्रक्रिया सुरू केली होती व याचा लकी ड्रॉ (सोडत) दिनांक ७ जून २०२४ रोजी झाली होती परंतु या सोडतीचा निकाल हा दिनांक १२ जून रोजी न्यायालयीन निकाला नंतर जाहीर होणार होता परंतु काही कारणास्तव ही न्यायालयीन सुनावणी पुढे ढकलली होती.
ही सुनावणी दिनांक १८ जून रोजी होत असताना या सुनावणी दरम्यान आणखी काही संघटनांनी व शाळांनी RTE प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत त्यामुळे RTE प्रकरणाची पुढील सुनावणी ही येत्या ४ जुलै २०२४ रोजी घेतली जाणार आहे. परिणामी पालकांना प्रवेशासाठी जुलै ची वाट पहावी लागणार आहे असे एका याचिकाकर्त्याच्या वकिलाने सांगितले आहे. मात्र पुढील सुनावणी ही ११ जुलै रोजी घेतली जाणार असल्याची माहिती याचिकाकर्ते शरद जावडेकर यांनी दिली आहे.
राज्य शालेय शिक्षण विभागाने RTE कायद्यात केलेला बदल हा योग्य आहे. त्यामुळे त्याला देण्यात आलेली स्थगिती उठवावी, अशी एक याचिका न्यायालयात सादर करण्यात आली आहे. तर काही शाळांनी कायद्यात बदल केल्यानुसार RTE च्या आरक्षित जागांवर प्रवेश देखील दिले आहेत. या जागांना संरक्षण द्यावे, अशीही याचिका दाखल झालेली आहे. या दोन्ही याचिकांची स्वतंत्र सुनावणी घ्यावी लागणार आहे. तसेच सध्या थांबलेल्या आरटीई प्रवेशाबाबत न्यायालयाने कोणाताही निर्णय दिलेला नाही.
हस्तक्षेप याचिका न्यायालयाने दाखल करून घेतल्या आहेत व हस्तक्षेप करणाऱ्या तीनही संस्थाना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी दहा दिवसाची मुदत न्यायालयाने दिली आहे. या संस्थांच्या प्रतिपादनावर जनहित याचिका कर्त्याना व शासनाला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी नंतरचे दहा दिवस देण्यात आले आहेत व याची अंतिम सुनावणी ११ जुलै २०२४ होणार आहे. पण याचा परिणाम हा RTE २५% राखीव जागेसाठी होणारे प्रवेश लांबणीवर पडणार आहेत आणि पालकांचा तणाव आणखीनच वाढणार आहे.
आत्ता विद्यार्थांना एसटी पास साठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही. पास आता मिळणार थेट शाळा महाविद्यालयात.!
.
सन २०२४- २५ शैक्षणिक वर्षाची शाळा दिनांक १५ जून २०२४ रोजी सुरू झाली आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची योजना आणली एसटी चे पास हे आता थेट शाळा महाविद्यालयात मिळणार आहेत. या नवीन योजने मुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शाळा आणि महाविद्यालयीन लाखो विद्यार्थी यांना फायदा होईल.
“एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही विशेष मोहीम सर्व महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) वतीने राबविण्यात येणार आहे असे मंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी माहिती दिली आहे. ही योजना राबविण्याबाबत सूचना त्यांनी महाराष्ट्रातील सर्व स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहे.
यापूर्वी विद्यार्थी विद्यार्थिनींना बसस्थानकावर जाऊन रांगेत उभे राहून पास घ्यावे लागत असत पण आता यापुढे पास घेण्यासाठी बसस्थानकावर जाण्याची किंवा रांग लावण्याची गरज नाही. शाळा किंवा महाविद्यालयाने दिलेल्या यादी नुसार एसटी कर्मचारी यांच्या मार्फत त्या विद्यार्थी विद्यार्थिनींना थेट शाळे मध्ये येऊन पास वितरित केले जाणार आहेत जेणे करून विद्यार्थांचा वेळ ही वाया जाणार नाही. ही योजना दिनांक १८ जून पासून एसटी प्रशासना मार्फत राबविण्यात येणार आहे. त्यापूर्वी सर्व शाळा महाविद्यालय यांना एसटी च्या आगार प्रमुख यांनी पत्र देऊन आपल्या शाळा महाविद्यालयातील पास धारक विद्यार्थी विद्यार्थिनींची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे. या अभिनव उपक्रमाचा फायदा राज्यातील लाखो विद्यार्थीना होणार आहे.
या वर्षातील पहिल्या सत्रातील शाळा सुरू झाल्या असून घरापासून शाळेपर्यंत व शाळेपासून घरापर्यंत ये जा करण्यासाठी विद्यार्थांना व विद्यार्थीनीना महामंडळाच्या एसटी च्या माध्यमातून महाराष्ट्रभर विविध योजना राबविल्या जातात विद्यार्थांना एसटी च्या पास साठी महामंडळ ६६% इतकी सवलत देत आहे तर ३३% प्रवास भाडे भरून मासिक पास देत आहे व विद्यार्थिनी साठी महामंडळ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजने अंतर्गत बारावी पर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थिनींना मोफत पास देत आहे.
शेतकरी मित्रांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती पीक विमा भरताना ह्या चुका होऊ देऊ नका अन्यथा आपल्याला विम्याचे पैसे मिळणार नाहीत?
.
विमा पॉलिसी हा घटक सर्वांच्या जीवनामध्ये एक अविभाज्य भाग बनला आहे. आगीचा विमा, आयुर्विमा, आरोग्य विमा, वाहन विमा, अपघात विमा तसेच पीक विमा असे वेगवेगळ्या विमा पॉलिसी घेणे हे सद्या धकाधकीच्या जीवनात गरजेचे झाले आहे. शेतकरी बांधवांसाठी तर पीक विमा हा अति महत्वता झाला आहे शेतकरी हा पिकाला जीवपाड जपत असतो परंतु विमा अर्ज भरताना शेतकऱ्यांनी ही काळजी घेणे आवश्यक आहे.
पीक विमा अर्ज भरताना खालील गोष्टींची काळजी घ्या.
यावर्षी २०२४ ला खरीप पीक विमा भरताना ज्या शेतकऱ्याचे आधार कार्ड, बँक पासबुक व सातबारा या सर्व कागदपत्रा वरील आपले पूर्ण नाव हे सारखे असले पाहिजे. या कागदपत्रात नावामध्ये थोडाफार बदल हा नसला पाहिजे.
उदाहरणार्थ :- ज्ञानेश्वर – ज्ञानदेव, बाळासाहेब – बाळू, राम – रामराव, महादू – महादेव, रौफ – रउफ, प्रभू – प्रभाकर, सरुबाई – सरस्वती, कासिम – काशिम, चंपाबाई – चंफाबाई असे अनेक उदाहरणे आहेत नावात बदल असल्याचे ज्यांचे नाव, वडिलांचे नाव व आडनाव यामध्ये असे बदल आहेत त्यांनी ते बदल अगोदर दुरुस्त करून घ्यावेत. कारण सर्व कागदपत्रावर सारखे नाव असेल तरच आपला विमा मजूर होणार आहे याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. तसेच काही शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर आडनाव नाहीत त्यांनी आडनाव टाकून घेणे गरजेचे आहे ते पण जसे आधार कार्ड वर बँक पासबुक वर आहे तसेच असणे आवश्यक आहे.
अगोदर जरी आपल्याला याच नावाने विमा मिळालेला असला तरी आता मिळेल याची खात्री नाही म्हणून अगोदर हे काम करा.
शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव 25% जागा भरणे हे लांबणीवर पडले आहे. कारण ही प्रक्रिया सध्या न्यायप्रविष्ठ असल्यामुळे न्यायालयामध्ये 12 जून रोजी सुनावणी होणार होती परंतु काही कारणास्तव ही सुनावणी पुढे ढकलली की 13 जून रोजी होईल असेल वाटले होते परंतु 13 जून रोजी ही सुनावणी झाली नसून ही सुनावणी आता दिनांक 18 जून रोजी होणार असून तोपर्यंत पालकांना प्रवेशासाठी वाट पहावी लागणार आहे.
सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी RTE २५% प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (लॉटरी) शुक्रवार दिनांक. ০७/০६/२০२४ रोजी झाली असून लकी ड्रॉ चा निकाल हा 18 जून नंतरच जाहीर होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.
RTE प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश अर्ज स्वीकारण्यात आलेले आहेत. राज्यातील ९ हजार २१७ शाळांत १ लाख ५ हजार ३९९ जागांवरील प्रवेशासाठी २ लाख ४२ हजार ९७२ अर्ज आलेले आहेत. आणि शिक्षण विभागा मार्फत प्रवेशासाठी ऑनलाईन लॉटरी काढलेली असली तरी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थांच्या पालकांना प्रवेशासाठी आणखीन काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण काही शाळा न्यायालयात गेल्या आहेत. या शाळांनी RTE २५% राखीव जागांवर इतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेले आहेत. त्यामुळे शाळांच्या प्रवेशाचे काय करायाचे? असा प्रश्न समोर आला आहे. त्यामुळे आता न्यायालयीन निकालानंतर हा प्रश्न सुटेल.
लोकसभेचा निकाल लागून चार दिवसांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि कामाला सुुवातही केली आहे आणि शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी दिली ती म्हणजे शेतकरी सन्मान योजनेचा १७ वा हप्ता जमा करण्यास मंजुरी दिली आहे तरी शेतकऱ्याच्या खात्यात लवकरच १७ वा हप्ता जमा होणार आहे.
पीएम किसान सन्मान योजनेचा १७ वा हप्ता जमा करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिली असून त्याची एकंदरीत रक्कम ही २० हजार कोटी रुपये असून ही रक्कम एकूण ९.३ कोटी शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्याच्या खात्यात दर वर्षी एकूण सहा हजार रुपये जमा होत आहेत. ज्या शेतकऱ्याचे नाव या लाभार्थी यादी मध्ये असेल अशा सर्व शेतकऱ्याला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या १७ व्या हप्त्याचा लाभ मिळेल.
असा पहा घरबसल्या आपला १७ वा हप्ता जमा झाला का.
सर्वात अगोदर आपण या संकेतस्थळावर जावे व नंतर Pm kisan beneficiary status या पर्यायावर जाऊन आपला खाते क्रमांक/ आधार क्रमांक टाकून सबमिट करा व आपले स्टेटस पहा आपले नाव लाभार्थी यादी मध्ये आहे का नाही ते समजेल.
लाभार्थ्याचे इ केवायसी पूर्ण झालेली असेल तर लाभार्थ्यासारखं मिळण्यास काही अडचण नाही तसेच खात्यासोबत लाभार्थ्याचे आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे तरच खात्यात रक्कम जमा होइल. शेतकऱ्यास पीएम किसान सन्मान योजने संबंधी काही अडचण येते असल्यास शेतकऱ्यांनी या 1800-115-5525 हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.
मुंबई पुणे सह काही भागात मुसळधार पाऊस, पुढील २४ तासात महाराष्ट्रात पाऊस!
Maharastra Rain Alerts पहा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट घोषित?
पुढील २४ तासात मुंबईत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पुढील चार दिवस राज्यातील विविधभागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
कोकण, मध्यमहाराष्ट्रमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे सध्या या भागामध्ये पाऊस सुरू आहे. पुढील २४ तासा मध्ये मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे आज पासून पुढील चार दिवस राज्यातील विविध भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची दाट शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
आयएमडीच्या माहिती नुसार आज ९ जून पासून मान्सूनचा प्रवास झपाट्याने होणार असल्याची माहिती दिली आहे, त्यामुळे राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी उत्तर कोकण, दक्षिण कोकण व मध्य महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट घोषित करण्यास आला आहे.
विदर्भ, मराठवाडा व उत्तर मध्य महाराष्ट्रात ही मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर उद्या दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तरी शेतकऱ्यांनी शेतीतील पेरणी पूर्व सर्व कामे लवकरात लवकर करून घ्यावीत. पाऊस हा भरपूर प्रमाणात पडणार असला तरी शेतकऱ्यांनी खरी हंगामाची पेरणी करताना गरबड करू नये असा सल्ला कृषी विभागा मार्फत देण्यात आला आहे.
सद्या पुण्यामध्ये जोरदार पाऊस पडत असून मुंबईतही पावसाचे आगमन झालेले आहे. येत्या काही तासातच मुंबईसह उपनगर, अहमदनगर, पालघर, सोलापूर, सांगली, नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मराठवाड्यातील जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर,वाशिम, चंद्रपूर या जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी शेतकऱ्यांनी व नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन देखील आयएमडी कडून करण्यात आलेलं आहे.
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शालेय शिक्षण विभाग सुमारे दहा ते अकरा वर्षांपासून सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी RTE २५% आरक्षित जागांवर प्रवेश दिला जात आहे. परंतु राज्य शासनाने यावर्षी कायद्यात बदल करून केवळ सरकारी शाळांमध्ये RTE अंतर्गत प्राधान्याने प्रवेश देण्याचे धोरण निश्चित केले. सरकारी शाळा उपलब्ध नसतील तरच खाजगी स्वयंम अर्थसहाय्यीत शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल, अशी नियमावली तयार केली. यावर विविध पालक संघटनांनी आवाज उठवला. त्यात काही संघटनांनी न्यायालया पर्यंत देखील धाव घेतली. त्यावर न्यायालयाने शासनाच्या अधीसूचनेल सूचनेला स्थगिती दिली आहे. राज्य शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यातील RTE २५% आरक्षण जागांच्या प्रवेशा संदर्भात विनाअनुदानित शाळांना वगळण्याबाबत काढलेल्या अधीसूचनेला आवाहन देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली गेली होती. न्यायालयात याबाबत सुनावणी घेण्यात आली त्यात राज्य शासनाने ९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेला स्थगिती देण्यात आली. व नंतर राज्य शिक्षण विभागाने पहिल्या सारखीच प्रवेश प्रक्रिया परत एकदा नव्याने सुरू केली.
ही प्रवेश प्रकिया पुन्हा नव्याने शुक्रवार दिनांक १७ मे २०२४ पासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली होती व दिनांक ३१/०५/२०२४ पर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार होते. परंतु राज्य शिक्षण विभागाने प्रवेश अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस वेळ वाढवून दिला होता. दिनांक ०४/०६/२०२४ पर्यंत प्रवेश अर्ज भरण्यास मुदत वाढ मिळाली होती.
सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी RTE २५% प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (लॉटरी) शुक्रवार दिनांक. ০७/০६/२০२४ रोजी सकाळी ११.०० वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे येथे काढण्यात येणार आहे. सदर सोडतचे थेट प्रक्षेपण व्ही.सी द्वारे करण्यात येणार आहे. आपणास ऑनलाईन या कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरिता https://youtube.com/live/bNgUW9iKSXO?feature=share लिक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी सर्व पालक या लिंक वर जाऊन ऑनलाइन सदर सोडतचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.
सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी RTE २५% प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (लॉटरी) शुक्रवार दिनांक. ০७/০६/२০२४ रोजी सकाळी ११.०० वाजता महाराष्ट्रराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे येथे काढण्यात येणार आहे. सदर सोडतचे थेट प्रक्षेपण व्ही.सी द्वारे करण्यात येणार आहे. आपणास ऑनलाईन या कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरिता https://youtube.com/live/bNgUW9iKSXO?feature=share लिक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी सर्व पालक या लिंक वर जाऊन ऑनलाइन सदर सोडतचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांची लॉटरी 7 जूनला काढण्यात येणार आहे. मात्र या लॉटरीचा निकाल तातडीने जाहीर न करता न्यायालयाच्या निर्देशानुसार 13 जूनला जाहीर केला जाईल, अशी माहिती राज्य सरकारने बुधवारी दिली आहे.
ऑनलाइन सोडतचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी खालील लिंक वर जा.
खेड्याला शहरापर्यंत जोडणारी जीवनवाहिनी एस टी चा आज ७६ वा वर्धापनदिन संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा होत आहे.
MSRTC Anniversary १ जून एस टी (लालपरी) चा ७६ वा वर्धापन दिन!
.
१ जून १९४८ रोजी सूरवात झाल्या पासून दर वर्षी एस टी चा वर्धापन दिन साजरा होत आहे आज १ जून २०२४ रोजी एस टी ७६ वर्षाची झाली असून ७६ वा वर्धापन दिन महाराष्ट्रभर सर्वच बसस्थानकावर प्रवाशी व कर्मचारी बांधवांना साखर पेढे वाटून तसेच शुभेच्छा देऊन साजरा केला जाणार आहे.
लालपरी म्हटलं की लहानांपासून थोरांपर्यंत आपलीशी वाटणारी. खेड्या पासून शहराला जोडणारी जीवनवाहिनी. पुणे – अहील्यानगर (अहमदनगर) मार्गावर १ जून १९४८ रोजी एस टी ची पहिली बस धावली आणि त्या दिवसापासून एस टी च्या प्रवासाला सुरुवात झाली. आणि आता सर्वत्र महाराष्ट्रभरच नव्हे तर अनेक राज्य एस टी प्रवास करत आहे. केवळ ३२ बेडफोर्ड बसेस पासून सुरू झालेला हा प्रवास आज ७६ वर्षात १५ हजार बसेस पर्यंत पोहचला आहे. या बसेस च्या माध्यमातून महाराष्ट्रभर ५६० पेक्षा ही जास्त बसस्थानकातून रोज सरासरी ५५ लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते आहे.
महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, स्वातंत्र्य सैनिक, तसेच पत्रकार अशा ३० पेक्षाही जास्त समाज घटकांना एस टी च्या प्रवाशी सेवेमध्ये राज्य शासन मार्फत सवलत दिली जात आहे. तसेच शालेय सहली साठी पण विशेष सवलत देण्यात येत आहे. याबरोबर दिवाळी, गणेश उत्सव, आषाढी, कार्तिकी यात्रा, अशा अनेक सणावाराच्या निमित्ताने नियमित तसेच ज्यादा फेऱ्याचे नियोजन करून प्रवाशांची सोय करत आहे. तसेच लग्न समारंभ, विविध शासकीय मोहत्सव व मेळावे यासाठी देखील सेवा पुरवते आहे.
दिवसेदिवस एस टी देखील कात टाकत चालली असून डिजिटल जगाबरोबर नवनवीन सेवा व सुविधा देत आहे. आत्ताच मागील काही दिवसामध्ये एस टी ने अँड्रॉइड तिकीट मशीन आणल्या असून यामध्ये UPI पेमेंट ची सुविधा चालू केली आहे तसेच ऑनलाइन आरक्षण करण्याची देखील सुविधा चालू आहे.
लालपरीचा रंजक इतिहास
देश स्वतंत्र झाल्यानंतर देशाचा स्वतंत्र कारभार सुरु होऊन एक वर्षही झाले नव्हते. त्याच काळात नवीन ध्येय-धोरणे आखली जात होती. त्याचाच एक भाग म्हणून खासगी वाहतूक व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यावेळी बॉम्बे स्टेट होते. १ जून १९४८ रोजी अहमदनगर माळीवाडा येथील लक्ष्मी मातेच्या मंदिराजवळ असलेल्या पिंपळाच्या झाडाला मोठी घंटा बांधली होती. बेडफोर्ड कंपनीची ३० आसन असलेली बस पहिल्या प्रवासासाठी सज्ज झाली. बसवर तिरंगा झेंडा फडकविण्यात आला होता. झाडावरची घंटा वाजली आणि स्वतंत्र भारताच्या पहिल्या राष्ट्रीयकृत प्रवासी वाहतूक सेवेला सुरुवात झाली. अहमदनगर ते पुणे पहिल्या बसचे प्रवास भाडे आठ आणे होते. अहमदनगर-पुणे मार्गावर धावलेल्या पहिल्या बसचे पहिले चालक श्री. किसनराव राउत तर पाहिले वाहक श्री. लक्ष्मण केवटे हे होते.
एकदम सुरुवातीला एसटीच्या ताफ्यात फोर्ट, शेवरलेट, बेडफोर्ड, सेडॉन, स्टुडबेकर, मॉरिस कमर्शियल, अल्बियन, लेलँड, कमर आणि फियाट अशा १० बसेस होत्या. १९५०च्या दशकाच्या सुरुवातीस, मॉरिस कमर्शियल चेसिससह दोन लक्झरी कोच दाखल झाल्या. त्यांना नीलकमल आणि गिर्यारोहिनी असे म्हणत. सन १९५० मध्ये केंद्राने रस्ता परिवहन महामंडळ कायदा पारित केला आणि महाराष्ट्रात बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन (बीएसआरटीसी) अस्तित्वात आले. राज्याची पुनर्रचना झाल्यानंतर याचे एमएसआरटीसी (MSRTC) मध्ये रुपांतर झाले. काळाच्या ओघात एसटी देखील बदलत गेली. ती खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची जीवनवाहिनी झाली.
RTE २५% जागांसाठी सुधारित शाळा व जागांची नवीन यादी संकेत्थळावर प्रसिद्ध झालेली असून २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील ९ हजार १३८ शाळांमध्ये १ लाख २ हजार ४३४ जागांवर नव्याने प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
RTE प्रवेश अर्ज भरण्यासाठी मिळाली मुदतवाढ! पहा कधीपर्यंत…
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शालेय शिक्षण विभाग सुमारे दहा ते अकरा वर्षांपासून सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी RTE २५% आरक्षित जागांवर प्रवेश दिला जात आहे. परंतु राज्य शासनाने यावर्षी कायद्यात बदल करून केवळ सरकारी शाळांमध्ये RTE अंतर्गत प्राधान्याने प्रवेश देण्याचे धोरण निश्चित केले. सरकारी शाळा उपलब्ध नसतील तरच खाजगी स्वयंम अर्थसहाय्यीत शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल, अशी नियमावली तयार केली. यावर विविध पालक संघटनांनी आवाज उठवला. त्यात काही संघटनांनी न्यायालया पर्यंत देखील धाव घेतली. त्यावर न्यायालयाने शासनाच्या अधीसूचनेल सूचनेला स्थगिती दिली आहे. राज्य शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यातील RTE २५% आरक्षण जागांच्या प्रवेशा संदर्भात विनाअनुदानित शाळांना वगळण्याबाबत काढलेल्या अधीसूचनेला आवाहन देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली गेली होती. न्यायालयात याबाबत सुनावणी घेण्यात आली त्यात राज्य शासनाने ९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेला स्थगिती देण्यात आली. व नंतर राज्य शिक्षण विभागाने पहिल्या सारखीच प्रवेश प्रक्रिया परत एकदा नव्याने सुरू केली.
ही प्रवेश प्रकिया शुक्रवार दिनांक १७ मे २०२४ पासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली होती व दिनांक ३१/०५/२०२४ पर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार होते. परंतु आणखीन ही काही पालकांकडून प्रवेश अर्ज भरण्याचे काम बाकी आहे. काही तांत्रिक अडचणी मुळे ही अर्ज भरता आले नसून याचा पुरेपूर विचार करून राज्य शिक्षण विभागाने प्रवेश अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस वेळ वाढवून दिला आहे. आता दिनांक ०४/०६/२०२४ पर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार आहेत. ही अंतिम मुदत वाढ असून यानंतर मुदत वाढ दिली जाणार नसून पालकांनी या मुदती पूर्वी आपले प्रवेश अर्ज भरण्याची विनंती केली आहे. तसेच स्थानिक स्तरावर व्यापक प्रमाणात याबाबत प्रसिद्धी देण्यात यावी असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.
RTE २५% जागांसाठी सुधारित शाळा व जागांची नवीन यादी संकेत्थळावर प्रसिद्ध झालेली असून २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील ९ हजार १३८ शाळांमध्ये १ लाख २ हजार ४३४ जागांवर नव्याने प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.