आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थांसाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवी पर्यंत इंग्रजी शाळांमध्ये २५% राखीव जागा मध्ये मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध केली जाते. या संबंधित विद्यार्थ्यांचे शुल्क सरकारमार्फत शाळांना दिले जाते.
यावर्षीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी १८ डिसेंबर २०२४ ला शाळा नोंदणी सुरू झाली होती. जवळपास शाळा नोंदणी प्रक्रिया ही पूर्ण झाली असून यंदा जवळपास साडेनऊ हजार शाळांची नोंदणी झाली आहे. एक लाखाहून अधिक जागा प्रवेशासाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
शाळा नोंदणीसाठी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदत दिली होती परंतु अपेक्षित नोंदणी न झाल्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने ०४ जानेवारी पर्यंत शाळा नोंदणीला मुदत वाढ देण्यात आली होती. आता शाळा नोंदणी ही पूर्ण झाली असून १४ जानेवारी पासून विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार आहे? असे प्राथमिक शिक्षण संचालनालया कडून अंदाज व्यक्त केला जात आहे.
आज RTE पोर्टलवर दिसत असलेल्या आकडेवारी नुसार ८ हजार ८४६ शाळांची नोंदणी झाली असून १ लाख ८ हजार ८५९ जागा उपलब्ध आहेत.
महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या योजने बद्दल दिली मोठी उपडेट
लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी उपडेट समोर येत आहे. लाडक्या बहिणींना धक्का बसण्याची शक्यता. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजने बद्दल मोठी माहिती दिली आहे. राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखा पेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक हातभार लागावा यासाठी हि योजना सरकारने चालू केली होती. परंतु आता या योजनेतून काही महिलांना वगळले जाऊ शकते. या योजनेतील ज्या महिलांचे अर्ज पात्र झाले आहेत अशा महिलांना डिसेंबर महिन्या पर्यंतचे सहा हप्त्याचे पंधराशे रुपये महिन्या प्रमाणे सर्व पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत.
पहा काय म्हणाल्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे!
मुख्यामंत्री लाडकी बहीण योजने बाबत पाच प्रकारच्या तक्रारी ह्या महिला व बालकल्याण विभागाकडे आल्या आहेत. वेगवेगळ्या बाजुने आम्ही या तक्रारीची पडताळणी करणार आहोत. त्यातील काही तक्रारी या स्थानिक प्रशासनाकडून आलेल्या आहेत, तर काही लाभार्थी महिलांनी पत्र लिहून या योजनेसाठी आता आम्ही पात्र नसल्याची माहिती दिली आहे. तक्रारी प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची पडताळणी होणार आहे. मात्र लाडकी बहीण योजनेच्या मूळ जीआर मध्ये कोणताही बदल होणार नाही असे मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.
पहा कोण कोणत्या अर्जाची होणार पडताळणी?
चार चाकी वाहनं असलेल्या महिलांच्या अर्जांची होणार पडताळणी.
ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तरी देखील या योजनेचा फायदा घेत आहेत अशा अर्जांची होणार छाननी.
एकच महिलेने दोन अर्ज दाखल केले आहेत अशा अर्जांची होणार छाननी.
लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या अर्जांची होणार पडताळणी.
आधार कार्डवर आणि कागद पत्रावर नावांमध्ये तफावत असलेल्या अर्जाची देखील पडताळणी होणार अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
तसेच अर्ज पडताळणी मध्ये ज्या लाभार्थी महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, किंवा त्यांच्या कडे चारचाकी वाहनं आहेत, अशा महिलांना आता या योजनेतून वगळलं जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याचा फटका हा राज्यातील अनेक लाडक्या बहिणींना बसू शकतो.
रिलायन्स जिओ ही भारतातील टेलिकॉम कंपन्या मधील एक मोठी कंपनी आहे. ही कंपनी आपल्या युजर्सना नेहमीच वेगवेगळे आकर्षक प्लॅन देत असते. असाचं एक धमाकेदार प्लॅन घोषित केला आहे. ६०१ रुपयांच्या रिचार्ज प्लॅन मध्ये एक वर्षासाठी अनलिमिटेड 5G डेटा देत आहे. हा प्लॅन खास करून त्या युजर्स साठी आहे जे युजर्स 5G अनलिमिटेड डेटा च्या शोधत आहेत. परंतु या प्लॅनसाठी काही नियम व अटी आहेत.
काय आहे ६०१ रुपयाचा नवीन प्लॅन.
रिलायन्स जिओचा हा ६०१ रुपयांचा रिचार्ज प्लॅन पूर्णपणे एक वर्षासाठी अनलिमिटेड 5G डेटा देत आहे. हा प्लॅन खास करून त्या युजर साठी आहे जे युजर्स 5G डाटा वापरत आहेत. हा प्लॅन त्यांच्या विद्यमान प्लॅनसह 5G डेटा वापरणाऱ्या वापरकर्त्यांसाठी विशेषतः आकर्षक आहे. तथापि, या प्लॅनचा लाभ फक्त त्या वापरकर्त्यांनाच मिळेल ज्यांच्याकडे आधीपासून जिओचा वैध आणि उच्च डेटा प्लॅन आहे. याचा अर्थ असा की जर तुमच्याकडे दररोज 1.5 GB किंवा त्याहून अधिक डेटा असलेला प्लान असेल तर तुम्ही या प्लॅनचा लाभ घेऊ शकता.
कोणत्या अटी आहेत आणि ही ऑफर कधी उपलब्ध होईल?
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधीपासून Jio डेटा प्लॅन असणे आवश्यक आहे. विशेषत:, तुमच्याकडे Jio चे Rs 199, Rs 239, Rs 299 किंवा त्याहून अधिक प्लॅन असले पाहिजेत जे दररोज किमान 1.5 GB डेटा देतात. जर तुमच्याकडे 1 जीबी प्रतिदिन डेटा असेल किंवा तुम्ही 1899 रुपयांचा वार्षिक प्लॅन घेतला असेल, तर तुम्हाला ही ऑफर मिळणार नाही, याचा अर्थ असा की तुमच्याकडे लहान डेटा असलेले प्लान असतील तर तुम्हाला आधी तुमचा प्लान अपग्रेड करावा लागेल. त्यानंतरच तुम्ही ६०१ रुपयांच्या या ऑफरचा लाभ घेऊ शकता.
६०१ रुपयांच्या प्लॅनसह कायफायदे उपलब्ध आहेत.
६०१ रुपयांच्या रिचार्जसह, तुम्हाला 12 अपग्रेड व्हाउचर मिळतील, जे तुम्ही My Jio ॲपद्वारे रिडीम करू शकता. प्रत्येक व्हाउचरची वैधता कमाल ३० दिवसांची असेल. उदाहरणार्थ, तुमचा बेस प्लान 28 दिवसांसाठी वैध असल्यास, पहिले व्हाउचर देखील 28 दिवसांसाठी वैध असेल. त्याचप्रमाणे, तुम्हाला पुढील 30 दिवसांसाठी दुसरे व्हाउचर सक्रिय करावे लागेल. या व्हाउचरचा लाभ घेतल्यानंतर तुम्ही पूर्णपणे अमर्यादित 5G डेटा वापरू शकता. Jio चे 5G नेटवर्क जलद गती आणि चांगली कनेक्टिव्हिटी प्रदान करते, जे तुम्हाला एक चांगला इंटरनेट अनुभव देईल. दरमहा हेवी डेटा वापरणाऱ्या आणि Jio च्या नेटवर्कवर सतत अमर्यादित 5G डेटाचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या वापरकर्त्यांसाठी हा प्लॅन उत्तम पर्याय आहे.
हा प्लॅन सक्रिय कसा करावा?
सर्वप्रथम, तुम्हाला My Jio ॲपवर लॉग इन करावे लागेल.
ॲपवर जा, ६०१ रुपयांचा प्लॅन निवडा आणि रिचार्ज करा.
रिचार्ज केल्यानंतर, तुम्हाला 12 व्हाउचर प्राप्त होतील, जे तुम्ही My Jio ॲपवरून रिडीम करू शकता.
व्हाउचरची वैधता 30 दिवसांची असेल, त्यामुळे त्यांची वेळेवर पूर्तता करा आणि अमर्यादित 5G डेटाचा लाभ घ्या.
महायुती सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात महिलांसाठी लाडकी बहिण योजना सरू केली. या योजनेच्या माध्यमातून महिलांना १५०० रुपये महिन्या प्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर महिलांच्या खात्यात पाच हप्ते जमा झाले. त्यानंतर विधानसभा निवडणूक लागली आणि या योजनेचा फायदा महायुतीला झाला राज्यामध्ये बहुमतात महायुतीचे सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे. व अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले व त्या नंतर ३३ कॅबिनेट तर ६ राज्यमंत्र्यांच्या शपथविधी देखील झाला परंतु अद्याप खाते वाटप झाली नाही.
महायुतीच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना ₹१५००/- ऐवजी ₹२१००/- असा उल्लेख आहे. परंतु लाडक्या बहिणीला पुढचा म्हणजेच डिसेंबर चा सहावा हप्ता अद्याप पर्यंत मिळाला नाही. तसेच सोशल मीडिया अनेक बातम्या फिरत आहेत की, लाडक्या बहिण योजनेचे निकष किंवा अटी बदलणार, लाडकी बहिण योजना बंद होणार अशा प्रकारच्या अनेक बातम्या ऐकून लाडक्या बहिणी संभ्रमात पडल्या आहेत की या योजनेचे काय होणार.? पण या योजने बद्दल स्वतः मुख्यमंत्री काय बोलले ते आपण पाहुयात.
नागपूर येथे सुरू असलेल्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उत्तर देताना लाडकी बहीण योजनेबद्दल स्पष्टच सांगून टाकल आहे की ही योजना बंद होऊ देणार नसून त्या योजनेचा डिसेंबर महिन्याचा म्हणजेच सहावा हप्ता हे अधिवेशन संपताच महिलांच्या खात्यात जमा करणार आहोत.
LIC Vima Sakhi Yojna महिला सशक्तीरण करणासाठी सरकार देशभर विविध योजना राबवत आहे. महिलांसाठी अशाच एका योजनेची घोषणा आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणा येथून केले आहे. “विमा सखी” योजना ही योजना संपूर्ण देशभर राबवली जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊ या योजने बद्दलची सर्व माहिती.
या योजनेचा उद्देश म्हणजे देशातील महिलांना आर्थिक स्वरूपात सशक्त व आत्मनिर्भर करणे हा असून या योजनेचा भाग होणाऱ्या महिलेस विमा सखी असे संबोधले जाणार आहे. या विमा सखी चे काम म्हणजे आपल्या भागातील महिलांना विमा पॉलिसी काढण्यास प्रवृत्त करणे व त्यासाठी त्यांना मदत करणे हे आहे.
➧ विमा सखी योजना म्हणजे काय?
LIC अर्थात लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनची ही योजना आहे. या मध्ये इच्छुक महिलांना सुरवातीला तीन वर्ष ट्रेनिंग दिले जाणार आहे. या काळात त्यांना वित्तीय समज वाढवली जाणार आहे तसेच त्यांना विम्याचे महत्त्व समजून सांगण्याची पद्धत शिकवली जाईल व या तीन वर्षाच्या काळात त्यांना मानधन देखील दिले जाणार आहे. ट्रेनिंग नंतर या महिला विमा एजंट म्हणून देखील काम करू शकतील. या मधील ग्रॅज्युएट झालेल्या महिलांना विकास अधिकारी (Devlopment Office) म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.
➧ विमा सखी साठी पात्रता
• विमा सखी योजने साठी फक्त महिलाच अर्ज करू शकतात.
• किमान दहावी (SSC) पास असणे आवश्यक आहे.
• या योजने साठी वयोमर्यादा किमान १८ ते ७० वयोगटातील महिला अर्ज करू शकतात.
• तीन वर्ष प्रशिक्षणानंतर या महिला विमा एजंट म्हणून काम करू शकतात.
➧ कसा करणार अर्ज?
• LIC च्या https://licindia.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन या योजनेचा अर्ज करता येईल.
• या संकेतस्थळावर गेल्यानंतर Click Here for Bima Sakhi या ठिकाणी क्लिक करा.
• अर्ज ओपन होईल या ठिकाणी नाव, जन्मदिनांक, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी व संपूर्ण पत्ता पिन कोड सह भरा.
• जर तुम्ही एलआयसी कर्मचारी, एलआयसी एजंट, डेव्हलपमेंट ऑफिसर, यांच्याशी संबंधित असाल तर त्याची माहिती इथे भरा.
• शेवटी कॅप्च्या कोड भरून अर्ज सबमिट करा.
➧ पहा विमा सखीनां किती पैसे मिळणार?
विमा सखी योजनेत प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना तीन वर्षाच्या प्रशिक्षणा दरम्यान दोन लाखाहून अधिक मानधन मिळण्याची शक्यता आहे. सुरवातीला पहिल्या वर्षी सात हजार रुपये, दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये तर तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये मासिक मानधन मिळणार आहे. या मध्ये कमिशन किंवा बोनसचा समावेश नसणार आहे. या महिला वर्ष भरात ज्या पॉलिसी विकतील त्या पॉलिसी पैकी ६५% टक्के पॉलिसी पुढील वर्षीच्या शेवटपर्यंत सक्रिय अर्थात चालू राहायला हव्यात. याचाच अर्थ असा की महिलांना केवळ पॉलिसी विकायच्याच नाहीत तर त्या चालू राहतील याची देखील काळजी घ्यायची आहे. त्यांना प्रत्येक वर्षी आपला परफॉर्मन्स दाखवावा लागणार आहे.
तीन वर्षाचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित महिला एलआयसी एजंट म्हणून नियुक्त होईल. किंवा ज्या महिलांचे शिक्षण जास्त आहे त्यांना डेव्हलपमेंट ऑफिसर होण्याची देखील संधी मिळेल. परंतु एलआयसी ची ती नियमित कर्मचारी नसेल. तसेच नियमित कर्मचाऱ्यांचे कुठलेही लाभ या एजंटला मिळणार नाही.
खरतर दिवाळी ही मनात असते. आकाश दिवे, 🪔 पणत्या, रांगोळ्या पक्वान्ने, सजावट ही सगळी आनंदाची बाह्यरूपं आहेत. एकमेकांबद्दल मनातून वाटणाऱ्या भावनांची ती केवळ प्रतिकं असतात. खरी दिवाळी असते ती मनामनात. आपल्या, एकमेकांबद्दल वाटणारा स्नेह, प्रेम, माया, वात्सल्य, आपलेपणा हीच खरी दिवाळी मनामनांची. म्हणूनच ह्या दिवाळीच्या शुभेच्छा मनाकडून – मनाकडे.
आपल्या जीवनातील सर्व नकारात्मकता नष्ट होऊन दिवाळीच्या चैतन्यमय प्रकाशात आपले आयुष्य उजळून निघावे. सर्वांना सौख्य, आनंद, निरामय आरोग्य लाभावे तसेच आपल्यावर सदैव लक्ष्मीची कृपा राहावी ही सदिच्छा..!
आपणांस व आपल्या परिवारास संपूर्ण दीपोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा..!
ज्या महिलांनी अर्ज केला नव्हता त्यांच्यासाठी आणखी एक संधी!
Mukhyamantri Ladki Bahin Yojna राज्यात आतापर्यंत २ कोटी ३० लाख महिला भगिनींना त्यांच्या खात्यामध्ये पाच महिन्याचे एकूण सात हजार पाचशे रुपये सरकारकडून जमा करण्यात आले आहेत. व ज्या महिलांना अद्याप पर्यंत लाडकी बहिण योजनेचा अर्ज केलेला नाही अशा महिलांना राज्य सरकारने विजयादशमीच्या पूर्व संधेला आनंदाची बातमी दिली आहे. लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरण्याची मुदत आता राज्य सरकारने १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत वाढवली आहे. मात्र हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविका मार्फतच भरावे लागणार आहेत. अशी सूचना शासनाकडून मिळाली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीला आता नव्याने अर्ज भरण्याची संधी प्राप्त झाली आहे. उर्वरित चार दिवसात अर्ज करून या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
राज्यातील लाडकी बहीण योजनेला मिळणार प्रचंड प्रतिसाद पाहून राज्य सरकारने या योजनेला मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी ३० सप्टेंबर ही योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत देली गेली होती. मागील महिन्यातही लाखो महिलांना आपले अर्ज दाखल केले होते. ज्या महिलांनी अर्ज सादर केले होते. त्यांना या योजनेचा लाभही मिळण्यास सुरुवात झाली होती. रक्षाबंधन सणाचा मुहूर्त साधत राज्य सरकारने या योजनेच्या पहिल्या हफ्याच्या वितरणास सुरुवात केली होती. तेव्हापासून आजपर्यंत राज्यातील तब्बल २ कोटी ३० लाख महिला या योजनेत पात्र ठरल्या असून त्यांच्या बँक खात्यावर DBT मार्फत पैसेही जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बहुतांश महिलांच्या बँक खात्यात आत्तापर्यंत पाच हप्त्याने ७५००/- रुपये जमा झाले आहेत. आता उर्वरीत महिलांनाही लाडकी बहीण योजनेसाठी १५ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. मात्र त्यासाठी केवळ अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिनांक ०५ ऑक्टोबर रोजी ४ हजार रुपये जमा होणार, आहेत अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली असून पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या दोन्ही योजनांचे ऑगस्ट व नोव्हेंबर चे हप्ते जमा होणार आहेत.
उद्या दिनांक ५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाशिम येथील बंजारा समाजाची काशी आलेल्या पोहरादेवी येथे देवीच्या दर्शना साठी येणार आहेत. तेथील होणाऱ्या समारंभा मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचा हप्ता ४ हजार रुपये जमा करणार आहेत.
देशातील शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) ही योजना फेब्रुवारी २०१९ पासून चालू केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास ( पती, पत्नी व त्यांची १८ वर्षा खालील अपत्ये ) यांना रु.२०००/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू.६०००/- हे त्यांच्या आधार व डीबीटी (DBT) संलग्न चालू बँक खात्यात लाभ जमा करण्यात येतो आहे. पीएम किसान योजने अंतर्गत दिनांक ३० सप्टेंबर २०२४ अखेर राज्यातील जवळपास १.२० कोटी शेतकरी कुटुंबांना एकूण १७ हप्त्या मध्ये सुमारे रू.३२ हजार कोटीचा लाभ जमा आत्तापर्यंत झालेला आहे.
दिवसेंदिवस विजेची वाढती मागणी पाहता सरकारने वीज उत्पादनाची वेगवेगळे पर्याय शोधले असून सद्या सौर ऊर्जेच्या वापरावर भर देण्यात आला आहे त्या साठी सरकार अनुदान देत आहे. सौर उर्जेचे महत्व लक्षात घेता राज्य सरकार कडून महाराष्ट्रात २०१५ पासून शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंपाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. यापूर्वी अटल शेतकरी कृषी सौर पंप योजना तसेच मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजना राबविण्यात आल्या होत्या, तसेच प्रधानमंत्री कुसुम घटक ब या योजनेअंतर्गत राज्यात ९ सप्टेंबर २०२४ पर्यंत २ लाख ६३ हजार १५६ कृषी सौर पंप बसवण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांना या सौर पंपाचा मिळालेला लाभ तसेच शेतकऱ्यांचा या सौर पंपा बाबतचा प्रतिसाद लक्षात घेता मागेल त्याला सौर पंप देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
➧ या शेतकऱ्यांना मिळेल प्राधान्य
महाराष्ट्र राज्य सरकारने २०२४ च्या अर्थसंकल्पात मागेल त्याला कृषी सौर पंप या योजनेची घोषणा केली असून या अंतर्गत राज्यातील जवळपास आठ लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना कृषी सोलर पंप देण्याचा मानस सरकारचा आहे. या अगोदर पीएम कुसुम अंतर्गत ही योजना राबविण्यात येत होती. परंतु सध्या शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात या सौर कृषी पंपाची मागणी होताना दिसून येत आहे. परंतु ज्या शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्रोत आहे किंवा ज्या शेतकऱ्याकडे सिंचना करीता पारंपरिक पद्धतीचा वीज पुरवठा नाही अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला कृषी सौर पंप योजना राबविण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्याने यापूर्वी महावितरण कडे पैसे भरून कृषी सौर पंप मिळालेला नाही अशा प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
➧ असा करावा अर्ज
मागेल त्याला कृषी सौर पंप या योजनेचा अर्ज करण्यासाठी महावितरण तर्फे स्वतंत्र वेब पोर्टल तयार केले आहे. त्या वेब पोर्टल वर जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index.php या वेबपोर्टलवर गेल्यानंतर लाभार्थी सुविधा या पर्यायावर जाणे व नंतर अर्ज करा या पर्यायावर गेल्यानंतर अर्ज ओपन होईल तो अर्ज संपूर्ण भरावा व आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करावीत व नंतर अर्ज सबमिट करावा.
➧ लागणारी आवश्यक कागदपत्र
➤ आधार कार्ड ➤ ७/१२ उतारा ➤ जात प्रमाणपत्र ( अनुसूचित जाती/जमातीच्या लाभार्थ्यांसाठी ) ➤ अर्जदार स्वतः शेतजमिनीचा मालक एकटा नसेल तर इतर हिस्सेदारांचा/मालकांचा नाहरकत दाखला देणे आवश्यक आहे. ➤ पाण्याचा स्त्रोत डार्क झोनमध्ये असल्यास भुजल सर्वेक्षण विभागा मार्फत ना हरकत प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. ➤ संपर्कासाठी मोबाईल क्रमांक. ईमेल (असल्यास) ➤ पाण्याची खोली व त्याची माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे.